शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

'त्या' मुद्द्यांवरून भारत चीनविरोधात जाण्याची शक्यता; ड्रॅगनच्या शेपटीवर पाय ठेवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 06:53 IST

दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती असली तरी प्रत्यक्षात तशी वेळ येण्याची शक्यता नसल्याची माहिती बीजिंग दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिली.

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली: भारत-चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांत लष्कर व राजनयिक स्तरावर जोरदार हालचाली सुरू असून भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्त्री व चीनचे परराष्ट्र राज्यमंत्री लुओ झाहुई यांच्यात बीजिंगमध्ये झालेल्या भेटीनंतर राजनयिक चर्चेस सुरुवात झाली. दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही चर्चा केली. हल्ल्याबद्दल भारतानं अत्यंत कठोर शब्दांत निषेध नोंदवला. लुओ झाहुई चीनचे भारतातील माजी राजदूत असून त्यांनीच स्वत:हून विक्रम मिस्त्री यांना चर्चेसाठी बोलावल्याचं समजतं. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती असली तरी प्रत्यक्षात तशी वेळ येण्याची शक्यता नसल्याची माहिती बीजिंग दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र भारत ६ जून रोजी झालेल्या बैठकीतील प्रस्तावावर ठाम आहे. त्यावेळी जैसे थे स्थिती बाळगण्यावर सहमती झाली होती.आशिया उपखंडात भारताचा प्रभाव वाढतो आहे. सात वर्षांत राजनयिक संबंधामध्ये भारतानं बदल केले. चीन याच प्रभावामुळे काहीसा अस्वस्थ झाला आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना भारतानं आश्रय दिला. मात्र चीनची दुखरी नस असलेला तैवान, हाँगकाँग येथील अल्पसंख्यांकावर होणारा अत्याचार व तिबेटवरून भारतानं आतापर्यंत चीनविरोधी भूमिका घेण्याचं टाळलं. मात्र यापुढे आमच्याकडून अशी अपेक्षा करू नका, इतक्य स्पष्ट शब्दांत राजनयिक चर्चेदरम्यान भारतानं स्पष्ट केलं होतं. 

मुत्सद्देगिरीत भारताची सरशीएका आयएफएस अधिकाऱ्यानं सांगितलं की, परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेनंतर भारतानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ६ जूनला ठरलेल्या भूमिकेचा उल्लेख केला; पण चिनी परराष्ट्र मंत्रालयानं जाणूनबुजून त्याचा उल्लेख टाळला. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत इथेच भारताची सरशी झाली. ६ जूनला नेमकं काय ठरलं, याचा उल्लेख वारंवार करूनच भारत आपली बाजू अजून ठामपणे मांडेल, असंही हा अधिकारी म्हणाला. स्थिती 'जैसे थे' ठेवण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं होतं. परंतु त्यानंतरही चिनी सैनिक या क्षेत्रातून मागे न हटल्यानं कर्नल संतोष त्यांना जाब विचारण्यास गेले. तेव्हाच चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. 

टॅग्स :chinaचीन