शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्यांत ‘एअर बबल’ अंतर्गत वाढ?; मागणी वाढल्याने पर्यायांची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 06:04 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून हवाई वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय बंदीमुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून हवाई वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय बंदीमुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी ‘एअर बबल’अंतर्गत आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्या वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत.कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय सेवा देण्यात अडचणी येत आहेत. केंद्र शासनाने अनेक देशांशी एअर बबल करार करून काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू ठेवली असली, तरी वाढत्या मागणीला सामावून घेण्यात अपयश येत आहे. एकीकडे हवाई वाहतूक क्षेत्र सावरत असताना सेवाविस्तार करण्यात अपयश आल्यास दूरगामी परिणामांना सामोरे जावे लागू शकते. ही बाब लक्षात घेऊन विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे.प्राप्त परिस्थितीत एअर बबल करार करून अधिकाधिक देशांत वाहतूक सुरू करणे, हा एकमेव मार्ग दिसत असल्यामुळे त्यादृष्टीने केंद्रीय पातळीवर पावले टाकली जात आहेत. त्यासाठी सर्व देशांशी चर्चा सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.एअर बबल म्हणजे काय?कोरोना काळात दोन देशांमध्ये तात्पुरती वाहतूक सुरू करण्यासाठी एअर बबल करार केला जातो. त्याअंतर्गत परस्पर सामंजस्याने विमान सेवा दिली जाते. त्याचा दोन्ही देशांतील विमान कंपन्यांना फायदा होतो.सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील निर्बंध तातडीने शिथिल होतील, अशी आशा नाही. त्यामुळे दुबई, सिंगापूर, फ्रान्स, यूके, अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका, कतार, सौदी अरेबिया, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाबरोबर असा करार करून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.