शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

उदार देशांच्या यादीत भारताला स्थान

By admin | Published: October 25, 2016 11:30 AM

उदार लोकांच्या तुलनेत भारतालाही अव्वल यादीत स्थान मिळाल्याचं एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - उदार लोकांच्या तुलनेत भारतालाही अव्वल यादीत स्थान मिळाल्याचं एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. अनोळखी लोकांना मदत करणे तसंच दान करणा-यांमध्ये भारतातीयांचा सहभाग जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे.  गेल्या काही दिवसांपासून समोर येत असलेल्या घटनांमुळे देशात अस्थिरता तसंच वैचारिक दिवाळखोरी असल्याचं बोललं जात असताना दुसरीकडे मात्र या बातमीमुळे भारतीयांना नक्कीच दिलासा मिळेल. 
 
चॅरिटी एड फाऊंडेशनने ही आकडेवारी जाहीर केली असून 2014 मध्ये भारत 106व्या स्थानी होता. मात्र 2015 मध्ये भारताने 91व्या स्थानी झेप घेतली आहे. अहवालानुसार 2015 मध्ये भारतातील 41 कोटी लोकांनी अनोळखी लोकांची मदत केली. जो आकडा 2014 मध्ये 33.5 कोटी होता. 
 
तसंच एकूण 20 कोटी लोकांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला होता. जो आकडा 2014 मध्ये एकूण 18.4 कोटी इतकाच होता. तर जिथे 2014 मध्ये 15.7 कोटी लोकांनी स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं, तिथे 2015 मध्ये हा आकडा 20 कोटींवर गेला आहे.
 
उदार देशांच्या यादीत म्यानमार 70 टक्क्यांसहित सर्वात अव्वल स्थानी आहे. म्यानमारमध्ये 63 टक्के लोकांनी अनोळखींची मदत केली तर 91 टक्के लोकांनी दान केलं आहे. तसंच 55 टक्के लोकांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली. म्यानमारनंतर अनुक्रमे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, कॅनडा, इंडोनेशिया, युके, आयर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातचा नंबर लागतो.