शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

सुरक्षेसाठी योग्य कारवाईचा भारताला पूर्णपणे अधिकार- संरक्षणमंत्री राजनाथसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 07:13 IST

लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला.

मॉस्को : चीननेभारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न करून दोन्ही देशांत झालेल्या करारांचा भंग केला आहे. त्यामुळे चीनने आपले सैन्य पूर्णपणे माघारी न्यावे असे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी निक्षून सांगितले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी उचित कारवाई करणे हा आमचा हक्क आहे असा इशाराही त्यांनी चीनला दिला आहे. तर आम्ही एकही इंच भूमी सोडणार नाही अशी दर्पोक्ती चीनने केली आहे.

लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. त्या घटनेपासून भारत व चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. या समस्येवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह व चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंघे यांच्यात शुक्रवारी मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. पण चीनने अडेलतट्टूपणाची भूमिका कायम ठेवल्याने या चचेर्तून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या बैठकीसाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे तसेच इतर देशांचे नेतेही रशियाच्या दौºयावर आले आहेत.या बैठकीनंतर चीनने एका पत्रकात म्हटले आहे की, सीमेवरील तणावास संपूर्णपणे भारतच जबाबदार आहे. आमच्या हक्काची एक इंचही जमीन आम्ही सोडणार नाही अशी दर्पोक्ती चीनने केली आहे असे चीनने म्हटले आहे. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात भारताने म्हटले आहे की, सीमेवर चीनने आक्रमक भूमिका घेत अनेक हालचाली सुरू आहेत. या गोष्टींमुळे दोन्ही देशांतील करारांचा चीनने भंग केला आहे.चीनकडून भारतीयांचे अपहरणअरुणाचल प्रदेशलगतच्या सीमाभागातील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या पाच भारतीय नागरिकांचे चिनी लष्कराने अपहरण केल्याची चर्चा आहे. ही घटना या राज्यातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील नाचो भागामध्ये शुक्रवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतchinaचीन