शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 12:50 IST

चीनने बुधवारी शिखराला नाव देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अरुणाचल प्रदेश हा आपल्या जांगनानचा भाग असल्याचे म्हटले आहे.

भारतानेअरुणाचल प्रदेशातील एका शिखराला नाव दिल्याने चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. यानंतर आता भारत आणि चीन यांच्यातील टेन्शन पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.  खरे तर, भारताने अरुणाचल प्रदेशातील एका शिखराला सहावे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयाने चीनला चांगलीच मिर्ची लागली असून याला विरोध करत त्याने या भागावर पुन्हा एकदा आपला दावा सांगितला आहे. चीनने बुधवारी शिखराला नाव देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अरुणाचल प्रदेश हा आपल्या जांगनानचा भाग असल्याचे म्हटले आहे.

सहाव्या दलाई लामांचेच नाव का देण्यात आले? -नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या (NIMS) टीमने अरुणाचल प्रदेशातील 20,942 फूट उंच असलेल्या आणि नाव नसलेल्या शिखरावर यशस्वी चढाई केली. यानंतर संघाने या शिखराला सहावे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 

एनआयएमएस (NIMS) संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते आणि अरुणाचल प्रदेशातील दिरांगमध्ये स्थित आहे. शिखराचे नामकरण करण्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सहाव्या दलाई लामा यांचे नाव शिखराला देणे, ही त्यांचे योगदान आणि बुद्धीला आदरांजली आहे. सहावे दलाई लामा, त्सांगयांग ग्यात्सो यांचा जन्म 1682 मध्ये मोन तवांग प्रदेशात झाला होता.

काय म्हणाला चीन -यासंदर्भात प्रश्न विचारला असता, चिनी परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हणाले, ‘‘आपण जो प्रश्न केला आहे, त्यासंदर्भात मला माहिती नाही. व्यापक दृष्टीने बोलायचे झाल्यास, जांगनानचा प्रदेश हा चीनचा प्रदेश आहे आणि भारताने चीनच्या भूभागात तथाकथित अरुणाचल प्रदेश स्थापन करणे बेकायदेशीर आणि अवैध आहे."

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत