शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Vice Admiral Anil Kumar Chawla : भारताने १९६५ सालीच आखली होती पाकिस्तानचे तुकडे करण्याची योजना, व्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 07:47 IST

Vice Admiral Anil Kumar Chawla : १९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानावर मिळविलेला विजय व बांगलादेशची झालेली निर्मिती या घटनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त येलाहांका येथे आयोजिलेल्या समारंभात ते बोलत होते.

बंगळुरू : पश्चिम पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तानचे विभाजन करून १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली असली तरी त्या योजनेची आखणी भारताने १९६५ सालापासूनच केली होती, असे नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रमुख अधिकारी व व्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला यांनी म्हटले आहे.

१९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानावर मिळविलेला विजय व बांगलादेशची झालेली निर्मिती या घटनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त येलाहांका येथे आयोजिलेल्या समारंभात ते बोलत होते. बांगलादेश निर्मितीसंदर्भातील काही कागदपत्रांचा हवाला देऊन अनिलकुमार चावला यांनी सांगितले की, पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचा ईशान्य भारतात हस्तक्षेप वाढला होता. या संघटनेकडून चितगावच्या डोंगराळ भागात नागा बंडखोरांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात येत असे. त्यामुळे भारताने मुक्ती वाहिनीच्या सदस्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती.

चावला म्हणाले की, १९६९ साली काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. तेव्हा इंदिरा गांधी यांना त्या पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पंतप्रधानपदी कायम राखण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले होते. या घडामोडींत भारताची बाजू काहीशी कमकुवत झाली होती. इंदिरा गांधी यांना विरोधक गुंगी गुडिया असे हिणवत असत. १९६९ साली पाकिस्तानमध्ये याह्याखान यांनी टिक्का खान यांच्याकडून सत्ता हिरावून घेतली. पश्चिम पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानवर वर्चस्व लादण्याचा याह्याखान यांचा प्रयत्न होता. त्यानुसार दोन्ही भागांसाठी त्यांनी १९७० साली एकत्रित सार्वत्रिक निवडणूक घेण्याची घोषणा केली.

अनिलकुमार चावला म्हणाले की, ३० जानेवारी १९७१ रोजी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून ते लाहोरला नेले. तिथे खरी ठिणगी पडली. १९७१च्या मार्च महिन्यात शेख मुजीबूर रहमान यांनी पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केली व त्यानंतर एप्रिल महिन्यात भारत पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात उतरला. त्यानंतर अशा घटना घडत गेल्या की, भारताची दुर्गामाता अशी इंदिरा गांधी यांची ओळख साऱ्या जगाला झाली. (वृत्तसंस्था)

आता युद्धाची सर्व तंत्रे बदललीव्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला म्हणाले की, युद्धनीतीच्या सर्व तत्त्वांचा अंगीकार करून १९७१च्या बांगलादेशचे युद्ध लढले गेले. आता परिस्थिती वेगळी आहे. युद्धाची सर्व तंत्रे आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलली आहेत. त्याचा विचार करून यापुढील युद्धे लढली जाणार आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत