शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

Vice Admiral Anil Kumar Chawla : भारताने १९६५ सालीच आखली होती पाकिस्तानचे तुकडे करण्याची योजना, व्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 07:47 IST

Vice Admiral Anil Kumar Chawla : १९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानावर मिळविलेला विजय व बांगलादेशची झालेली निर्मिती या घटनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त येलाहांका येथे आयोजिलेल्या समारंभात ते बोलत होते.

बंगळुरू : पश्चिम पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तानचे विभाजन करून १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली असली तरी त्या योजनेची आखणी भारताने १९६५ सालापासूनच केली होती, असे नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रमुख अधिकारी व व्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला यांनी म्हटले आहे.

१९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानावर मिळविलेला विजय व बांगलादेशची झालेली निर्मिती या घटनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त येलाहांका येथे आयोजिलेल्या समारंभात ते बोलत होते. बांगलादेश निर्मितीसंदर्भातील काही कागदपत्रांचा हवाला देऊन अनिलकुमार चावला यांनी सांगितले की, पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचा ईशान्य भारतात हस्तक्षेप वाढला होता. या संघटनेकडून चितगावच्या डोंगराळ भागात नागा बंडखोरांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात येत असे. त्यामुळे भारताने मुक्ती वाहिनीच्या सदस्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती.

चावला म्हणाले की, १९६९ साली काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. तेव्हा इंदिरा गांधी यांना त्या पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पंतप्रधानपदी कायम राखण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले होते. या घडामोडींत भारताची बाजू काहीशी कमकुवत झाली होती. इंदिरा गांधी यांना विरोधक गुंगी गुडिया असे हिणवत असत. १९६९ साली पाकिस्तानमध्ये याह्याखान यांनी टिक्का खान यांच्याकडून सत्ता हिरावून घेतली. पश्चिम पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानवर वर्चस्व लादण्याचा याह्याखान यांचा प्रयत्न होता. त्यानुसार दोन्ही भागांसाठी त्यांनी १९७० साली एकत्रित सार्वत्रिक निवडणूक घेण्याची घोषणा केली.

अनिलकुमार चावला म्हणाले की, ३० जानेवारी १९७१ रोजी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून ते लाहोरला नेले. तिथे खरी ठिणगी पडली. १९७१च्या मार्च महिन्यात शेख मुजीबूर रहमान यांनी पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केली व त्यानंतर एप्रिल महिन्यात भारत पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात उतरला. त्यानंतर अशा घटना घडत गेल्या की, भारताची दुर्गामाता अशी इंदिरा गांधी यांची ओळख साऱ्या जगाला झाली. (वृत्तसंस्था)

आता युद्धाची सर्व तंत्रे बदललीव्हाइस ॲडमिरल अनिलकुमार चावला म्हणाले की, युद्धनीतीच्या सर्व तत्त्वांचा अंगीकार करून १९७१च्या बांगलादेशचे युद्ध लढले गेले. आता परिस्थिती वेगळी आहे. युद्धाची सर्व तंत्रे आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलली आहेत. त्याचा विचार करून यापुढील युद्धे लढली जाणार आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत