शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘फेक न्यूज’चा जगात सर्वाधिक धोका भारताला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 08:38 IST

फेक न्यूजमुळे देशात मोठी अस्थिरता पसरू शकते, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.

-चंद्रकांत दडस

नवी दिल्ली : यंदा जगभरातील तब्बल ७० देशांमध्ये निवडणुका असताना खोट्या माहितीचा (फेक न्यूज) धोका नागरिकांना निर्माण झाला आहे. चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा जगात सर्वाधिक धोका भारताला आहे. भारतात वाढते आजार, गैरव्यवहार, संपत्तीची असमानता, कामगार टंचाईचा धोका असताना आता चुकीच्या माहितीचाही (फेक न्यूज) देशाला मोठा फटका बसतो आहे. एप्रिल ते मेदरम्यान लोकसभा निवडणुकांत १.४ अब्ज लोकसंख्या निवडणुकीला सामोरी जाण्यास तयार असताना वाढलेल्या फेक न्यूजमुळे चिंता निर्माण झाली आहे. फेक न्यूजमुळे देशात मोठी अस्थिरता पसरू शकते, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.

धोका कुठे? फेक न्यूजचा सर्वाधिक धोका भारतासह, अल साल्वाडोर, सौदी अरेबिया, पाकिस्तान, रोमानिया, आयर्लंड, अमेरिका, सिएरा लिओन, फ्रान्स आणि फिनलंड या देशांना आहे.

२०१९च्या निवडणुकीमध्येही...भारतात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही फेक न्यूज मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आल्या होत्या. व्हॉट्सॲप, फेसबुकचा वापर करून पक्षांनी समर्थकांना भडकावणारे संदेश प्रसारित केले होते. यामुळे हिंसा भडकण्याची भीती निर्माण झाली होती. कोराेनाकाळातही व्हॉट्सॲपद्वारे चुकीची माहिती  देण्यात येत होती.

अहवाल कुणाचा? जागतिक आर्थिक मंचने सादर केलेल्या ग्लोबल रिस्क अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

फेक न्यूजमुळे काय होईल?फेक न्यूजमुळे लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवून  नवनिर्वाचित सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.राजकीय अशांतता, हिंसाचार आणि दहशतवाद आणि  लोकशाही डळमळीत करण्याचा प्रयत्न फेक न्यूजच्या माध्यमातून करण्यात येईल. जगभरातील १,४९० तज्ज्ञांच्या मतांचा आधार घेत हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

टॅग्स :Indiaभारत