शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

‘फेक न्यूज’चा जगात सर्वाधिक धोका भारताला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 08:38 IST

फेक न्यूजमुळे देशात मोठी अस्थिरता पसरू शकते, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.

-चंद्रकांत दडस

नवी दिल्ली : यंदा जगभरातील तब्बल ७० देशांमध्ये निवडणुका असताना खोट्या माहितीचा (फेक न्यूज) धोका नागरिकांना निर्माण झाला आहे. चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा जगात सर्वाधिक धोका भारताला आहे. भारतात वाढते आजार, गैरव्यवहार, संपत्तीची असमानता, कामगार टंचाईचा धोका असताना आता चुकीच्या माहितीचाही (फेक न्यूज) देशाला मोठा फटका बसतो आहे. एप्रिल ते मेदरम्यान लोकसभा निवडणुकांत १.४ अब्ज लोकसंख्या निवडणुकीला सामोरी जाण्यास तयार असताना वाढलेल्या फेक न्यूजमुळे चिंता निर्माण झाली आहे. फेक न्यूजमुळे देशात मोठी अस्थिरता पसरू शकते, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.

धोका कुठे? फेक न्यूजचा सर्वाधिक धोका भारतासह, अल साल्वाडोर, सौदी अरेबिया, पाकिस्तान, रोमानिया, आयर्लंड, अमेरिका, सिएरा लिओन, फ्रान्स आणि फिनलंड या देशांना आहे.

२०१९च्या निवडणुकीमध्येही...भारतात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही फेक न्यूज मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आल्या होत्या. व्हॉट्सॲप, फेसबुकचा वापर करून पक्षांनी समर्थकांना भडकावणारे संदेश प्रसारित केले होते. यामुळे हिंसा भडकण्याची भीती निर्माण झाली होती. कोराेनाकाळातही व्हॉट्सॲपद्वारे चुकीची माहिती  देण्यात येत होती.

अहवाल कुणाचा? जागतिक आर्थिक मंचने सादर केलेल्या ग्लोबल रिस्क अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

फेक न्यूजमुळे काय होईल?फेक न्यूजमुळे लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवून  नवनिर्वाचित सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.राजकीय अशांतता, हिंसाचार आणि दहशतवाद आणि  लोकशाही डळमळीत करण्याचा प्रयत्न फेक न्यूजच्या माध्यमातून करण्यात येईल. जगभरातील १,४९० तज्ज्ञांच्या मतांचा आधार घेत हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

टॅग्स :Indiaभारत