शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

‘फेक न्यूज’चा जगात सर्वाधिक धोका भारताला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 08:38 IST

फेक न्यूजमुळे देशात मोठी अस्थिरता पसरू शकते, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.

-चंद्रकांत दडस

नवी दिल्ली : यंदा जगभरातील तब्बल ७० देशांमध्ये निवडणुका असताना खोट्या माहितीचा (फेक न्यूज) धोका नागरिकांना निर्माण झाला आहे. चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा जगात सर्वाधिक धोका भारताला आहे. भारतात वाढते आजार, गैरव्यवहार, संपत्तीची असमानता, कामगार टंचाईचा धोका असताना आता चुकीच्या माहितीचाही (फेक न्यूज) देशाला मोठा फटका बसतो आहे. एप्रिल ते मेदरम्यान लोकसभा निवडणुकांत १.४ अब्ज लोकसंख्या निवडणुकीला सामोरी जाण्यास तयार असताना वाढलेल्या फेक न्यूजमुळे चिंता निर्माण झाली आहे. फेक न्यूजमुळे देशात मोठी अस्थिरता पसरू शकते, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.

धोका कुठे? फेक न्यूजचा सर्वाधिक धोका भारतासह, अल साल्वाडोर, सौदी अरेबिया, पाकिस्तान, रोमानिया, आयर्लंड, अमेरिका, सिएरा लिओन, फ्रान्स आणि फिनलंड या देशांना आहे.

२०१९च्या निवडणुकीमध्येही...भारतात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही फेक न्यूज मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आल्या होत्या. व्हॉट्सॲप, फेसबुकचा वापर करून पक्षांनी समर्थकांना भडकावणारे संदेश प्रसारित केले होते. यामुळे हिंसा भडकण्याची भीती निर्माण झाली होती. कोराेनाकाळातही व्हॉट्सॲपद्वारे चुकीची माहिती  देण्यात येत होती.

अहवाल कुणाचा? जागतिक आर्थिक मंचने सादर केलेल्या ग्लोबल रिस्क अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

फेक न्यूजमुळे काय होईल?फेक न्यूजमुळे लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवून  नवनिर्वाचित सरकारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.राजकीय अशांतता, हिंसाचार आणि दहशतवाद आणि  लोकशाही डळमळीत करण्याचा प्रयत्न फेक न्यूजच्या माध्यमातून करण्यात येईल. जगभरातील १,४९० तज्ज्ञांच्या मतांचा आधार घेत हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

टॅग्स :Indiaभारत