शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका आणि चीनशी योग्य ताळमेळ साधण्याचे भारतासमोर आव्हान : विजय गोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 14:05 IST

चीनबाबत आपला अभ्यासच कमी असल्याने आपले काही अंदाज चुकत गेले. संकटाला तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेला कमी लेखून चालणार नाही.

ठळक मुद्दे '२१ व्या शतकातील भारत - चीन संबंध: आव्हाने आणि संधी’ परिसंवाद संकटाला तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेला कमी लेखून नाही चालणार

पुणे :अमेरिकेने स्वत:नेच निर्माण केलेल्या जागतिक व्यवस्थेला धक्के देण्यास सुरूवात केली आहे. ब्रेक्झिटमुळे युरोपियन महासंघाला मोठा फटका बसला आहे. रशियाला नव्या रशियाच्या निर्मितीसाठी भक्कम, शाश्वत आर्थिक पाया साधता आलेला नाही. जपानच्या हातून संधी निघून गेली आहे. चीनचा उदय होत असताना जगाच्या क्षितीजावर अमेरिकेशिवाय कोणीही नाही. हीच भारतासाठी योग्य संधी आहे. सध्याची महासत्ता अमेरिका आणि उगवती महासत्ता चीन या दोघांशीही योग्य ताळमेळ साधण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे,असे मत माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंगळवारी व्यक्त केले.’सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (सीएएसएस) आणि ’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ (एमईएस) यांच्या वतीने  '२१ व्या शतकातील भारत - चीन संबंध: आव्हाने आणि संधी’ या परिसंवादात ते बोलत होते.याप्रसंगी एमईएसचे अध्यक्ष व कॅसचे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), कॅसचे अध्यक्ष मेजर जनरल शिशिर महाजन, माजी राजनैतिक अधिकारी एम. के. मंगलमूर्ती आदी या वेळी उपस्थित होते.गोखले म्हणाले, चीनचा विकासाचा दर हा जगात सर्वाधिक आहे. आपल्या विकासाचा दर वाढला तरी आपण पुढच्या दोन दशकांमध्येही चीनची बरोबरी करणे शक्य होणार नाही. चीनचा विकासदर कदाचित कमी होऊ शकेल. काही आर्थिक संकटे येऊ शकतील. सध्याच्या कोरोनाचाही चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मात्र, संकटाला तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेला कमी लेखून चालणार नाही. चीनच्या नेतृत्वाने आता फक्त विकासावर भर देण्याऐवजी राहणीमानाचा दर्जा सुधारण्यावर भर दिला आहे. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, संशोधन याला ते अधिक महत्त्व देत आहेत. शिक्षणावर भर देऊन तांत्रिक बाबतीत युरोपीय देशांनी घेतलेली आघाडी चीनने मोडून काढण्याचा चंग बांधला आहे. पूर्वीच्या ‘कॉपी कॅट मॉडेल’  या ओळखीतून बाहेर पडत चीन आता नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीत आघाडी घेत आहे, असे निरीक्षणही गोखले यांनी नोंदवले.     आपण कच्चा माल, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअरसाठी चीनवर अवलंबून आहोत. त्यामुळे आपण चीनला थेट आव्हान देऊ शकणार नाही. मात्र अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध आणि करोना व्हायरस यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाली आहे. इतरही देश त्यासाठी सज्ज आहेत. त्यांचे धोरण तुलनेने अधिक खुले आहे. त्यामुळे ही संधी साधायची असेल तर भारताला आपल्या धोरणांमध्ये व्यापक बदल करावे लागतील, चीनबाबत आपला अभ्यासच कमी असल्याने आपले काही अंदाज चुकत गेले. आजही आपल्याकडे चीनविषयीच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्त्या नाहीत. त्यामुळे आपल्याकडे चीनविषयीच्या ज्ञानाची प्रचंड कमतरता आहे. ही कमतरता भरून काढणे ही केवळ सरकारची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे. या शिष्यवृत्त्यांमध्ये चीनमध्ये काय चालले आहे, याच्या अभ्यासाबरोबरच जगभरात चीनविषयी काय सुरू आहे, याचा अभ्यास होणेही महत्त्वाचे असल्याचे गोखले यांनी सांगितले.    अन्य सत्रांमध्ये तैवान अ‍ॅल्युम्नाय असोसिएशनच्या अध्यक्षा नम्रता हसीजा, लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी (निवृत्त), कमांडर अर्नब दास (निवृत्त), परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी गौतम बंबावाले, एम. के. मंगलमूर्ती, सुधीर देवरे, प्रियांका पंडित यांनी आपली मते मांडली.

टॅग्स :PuneपुणेVijay Gokhaleविजय गोखलेchinaचीनAmericaअमेरिकाrussiaरशिया