शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अमेरिका आणि चीनशी योग्य ताळमेळ साधण्याचे भारतासमोर आव्हान : विजय गोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 14:05 IST

चीनबाबत आपला अभ्यासच कमी असल्याने आपले काही अंदाज चुकत गेले. संकटाला तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेला कमी लेखून चालणार नाही.

ठळक मुद्दे '२१ व्या शतकातील भारत - चीन संबंध: आव्हाने आणि संधी’ परिसंवाद संकटाला तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेला कमी लेखून नाही चालणार

पुणे :अमेरिकेने स्वत:नेच निर्माण केलेल्या जागतिक व्यवस्थेला धक्के देण्यास सुरूवात केली आहे. ब्रेक्झिटमुळे युरोपियन महासंघाला मोठा फटका बसला आहे. रशियाला नव्या रशियाच्या निर्मितीसाठी भक्कम, शाश्वत आर्थिक पाया साधता आलेला नाही. जपानच्या हातून संधी निघून गेली आहे. चीनचा उदय होत असताना जगाच्या क्षितीजावर अमेरिकेशिवाय कोणीही नाही. हीच भारतासाठी योग्य संधी आहे. सध्याची महासत्ता अमेरिका आणि उगवती महासत्ता चीन या दोघांशीही योग्य ताळमेळ साधण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे,असे मत माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंगळवारी व्यक्त केले.’सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (सीएएसएस) आणि ’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ (एमईएस) यांच्या वतीने  '२१ व्या शतकातील भारत - चीन संबंध: आव्हाने आणि संधी’ या परिसंवादात ते बोलत होते.याप्रसंगी एमईएसचे अध्यक्ष व कॅसचे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), कॅसचे अध्यक्ष मेजर जनरल शिशिर महाजन, माजी राजनैतिक अधिकारी एम. के. मंगलमूर्ती आदी या वेळी उपस्थित होते.गोखले म्हणाले, चीनचा विकासाचा दर हा जगात सर्वाधिक आहे. आपल्या विकासाचा दर वाढला तरी आपण पुढच्या दोन दशकांमध्येही चीनची बरोबरी करणे शक्य होणार नाही. चीनचा विकासदर कदाचित कमी होऊ शकेल. काही आर्थिक संकटे येऊ शकतील. सध्याच्या कोरोनाचाही चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मात्र, संकटाला तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेला कमी लेखून चालणार नाही. चीनच्या नेतृत्वाने आता फक्त विकासावर भर देण्याऐवजी राहणीमानाचा दर्जा सुधारण्यावर भर दिला आहे. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, संशोधन याला ते अधिक महत्त्व देत आहेत. शिक्षणावर भर देऊन तांत्रिक बाबतीत युरोपीय देशांनी घेतलेली आघाडी चीनने मोडून काढण्याचा चंग बांधला आहे. पूर्वीच्या ‘कॉपी कॅट मॉडेल’  या ओळखीतून बाहेर पडत चीन आता नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीत आघाडी घेत आहे, असे निरीक्षणही गोखले यांनी नोंदवले.     आपण कच्चा माल, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअरसाठी चीनवर अवलंबून आहोत. त्यामुळे आपण चीनला थेट आव्हान देऊ शकणार नाही. मात्र अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध आणि करोना व्हायरस यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाली आहे. इतरही देश त्यासाठी सज्ज आहेत. त्यांचे धोरण तुलनेने अधिक खुले आहे. त्यामुळे ही संधी साधायची असेल तर भारताला आपल्या धोरणांमध्ये व्यापक बदल करावे लागतील, चीनबाबत आपला अभ्यासच कमी असल्याने आपले काही अंदाज चुकत गेले. आजही आपल्याकडे चीनविषयीच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्त्या नाहीत. त्यामुळे आपल्याकडे चीनविषयीच्या ज्ञानाची प्रचंड कमतरता आहे. ही कमतरता भरून काढणे ही केवळ सरकारची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे. या शिष्यवृत्त्यांमध्ये चीनमध्ये काय चालले आहे, याच्या अभ्यासाबरोबरच जगभरात चीनविषयी काय सुरू आहे, याचा अभ्यास होणेही महत्त्वाचे असल्याचे गोखले यांनी सांगितले.    अन्य सत्रांमध्ये तैवान अ‍ॅल्युम्नाय असोसिएशनच्या अध्यक्षा नम्रता हसीजा, लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी (निवृत्त), कमांडर अर्नब दास (निवृत्त), परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी गौतम बंबावाले, एम. के. मंगलमूर्ती, सुधीर देवरे, प्रियांका पंडित यांनी आपली मते मांडली.

टॅग्स :PuneपुणेVijay Gokhaleविजय गोखलेchinaचीनAmericaअमेरिकाrussiaरशिया