शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

अभिनंदन यांची विनाअट सुटका करा, काही बरेवाईट झाल्यास कारवाई करू, भारताचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:22 IST

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्याचा भारताने नकार दिला आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्याचा भारताने नकार दिला आहे. अभिनंदन यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी भारताने केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयामधील सुत्रांनी दिली आहे. तसेच अभिनंदन यांना काही झाल्याच भारत कठोर पावले उचलेल असा इशाराही देण्यात आला आहे.बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. दरम्यान, अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताकडून आक्रमक पावले उचलण्यात आली असून, त्यासंदर्भात पाकिस्तानशीही संपर्क साधण्यात आला होता.   विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तान चर्चेस तयास असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी म्हटले होते. मात्र त्याला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने अभिनंदन यांच्या सुटकेसाठी कुठल्याही तडजोडी करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ''पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची तात्काळ सुटका करावी. या प्रकरणात कुठल्याही वाटाघाटी करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. जर पाकिस्तान याबाबत काही तडजोडी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती त्यांची चूक आहे. तसेच विंग कमांडर अभिनंदन यांच्याशी मानवतावादी दृष्टीकोनातून व्यवहार व्हावा, असे भारताने म्हटले आहे. 

यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्याचाही तीव्र शब्दात निषेध केला. ''दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना भारताने लोकवस्ती आणि पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले नाही. मात्र पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भारताने केला. तसेच पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात विश्वसनीय कारवाई करावी, अशी मागणीही भारताने केली आहे. 

भारताने मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यानंतरही पाकिस्तानला पुरावे पाठवले होते. आता पुलवामा हल्ल्याला 13 दिवस उलटल्यानंतरही पाकिस्तान या हल्ल्यामागील जैश ए मोहम्मदची भूमिका नाकारत आहे. 

 

 

टॅग्स :Indiaभारतindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान