शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"रशियाकडून इंधन खरेदी करून भारताने जगावर उपकार केले"; केंद्रीय मंत्र्यांचे मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 13:52 IST

भारताने जगावर उपकार केल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे.

Hardeep Singh Puri : भारताने रशियाकडून इंधन विकत घेऊन जगावर उपकार केले असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. भारताने रशियाकडून इंधन विकत घेतले नसते तर त्याची किंमत अधिक वेगाने वाढली असती. असे करून भारताने जगावर उपकार केल्याचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले. केंद्रीय मंत्री पुरी यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहीत ही माहिती दिली आहे. पुरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते मुलाखत देताना दिसत आहेत.

युक्रेनवर लष्करी कारवाई केल्यामुळे रशियाला अनेक देशांच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी भारताने रशियाकडून इंधन खरेदीचा निर्णय घेतला होता. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या म्हणण्यानुसार, युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून इंधन खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे जागतिक तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ रोखण्यात मदत झाली आहे. अबुधाबीमध्ये दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री पुरी यांनी म्हटलं की जर भारत सरकारने रशियाकडून इंधन विकत घेतले नसते तर जागतिकस्तरावर इंधनाची किंमत सर्वांसाठी २०० डॉलरपर्यंत वाढली असती.

रशियातील इंधनावर कोणतेही निर्बंध नसल्याचे केंद्रीय मंत्री पुरी यांनी म्हटले आहे.'रशियन इंधन खरेदी करून भारताने संपूर्ण जगावर उपकार केले आहेत, कारण आम्ही तसे केले नसते तर जागतिक किंमत प्रति बॅरल २०० डॉलरने वाढली असती. रशियन तेलावर कधीही बंदी नव्हती, फक्त किंमतीची मर्यादा होती. भारतीय कंपन्यांनी याचे पालन केले आहे, असं पुरी म्हणाले.

अपूर्ण माहिती असलेल्यांनी हे विसरू नये की त्यांनी भारतावर निर्बंध लादण्याची चर्चा केली होती. अनेक युरोपियन, आशियाई देशांनी अब्जावधी डॉलर्सचे कच्चे तेल, डिझेल, एलएनजी आणि दुर्मिळ खनिजे खरेदी केली आहेत. आमच्या तेल कंपन्यांना जो सर्वोत्तम दर देईल त्यांच्याकडून आम्ही ऊर्जा खरेदी करत राहू, असेही हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा हा विश्वास आहे. दररोज पेट्रोल पंपांना भेट देणाऱ्या आमच्या सात कोटी नागरिकांची उपलब्धता आणि सातत्य आम्हाला सुनिश्चित करण्याची गरज आहे. हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य असल्याचे पुरींनी म्हटलं.

भारत हा एकमेव सर्वात मोठा ग्राहक आहे, जेथे इतर देशांमध्ये अभूतपूर्व जागतिक किमतीत वाढ झाल्यानंतर ३ वर्षांत तेलाच्या किमती झपाट्याने घसरल्या आहेत.' विशेष बाब म्हणजे भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आहे, जो आपल्या गरजेच्या ८० टक्के गरजांसाठी परदेशातून खरेदीवर अवलंबून आहे, असेही पुरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतPetrolपेट्रोल