शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

"रशियाकडून इंधन खरेदी करून भारताने जगावर उपकार केले"; केंद्रीय मंत्र्यांचे मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 13:52 IST

भारताने जगावर उपकार केल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे.

Hardeep Singh Puri : भारताने रशियाकडून इंधन विकत घेऊन जगावर उपकार केले असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. भारताने रशियाकडून इंधन विकत घेतले नसते तर त्याची किंमत अधिक वेगाने वाढली असती. असे करून भारताने जगावर उपकार केल्याचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले. केंद्रीय मंत्री पुरी यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहीत ही माहिती दिली आहे. पुरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते मुलाखत देताना दिसत आहेत.

युक्रेनवर लष्करी कारवाई केल्यामुळे रशियाला अनेक देशांच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी भारताने रशियाकडून इंधन खरेदीचा निर्णय घेतला होता. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या म्हणण्यानुसार, युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून इंधन खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे जागतिक तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ रोखण्यात मदत झाली आहे. अबुधाबीमध्ये दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री पुरी यांनी म्हटलं की जर भारत सरकारने रशियाकडून इंधन विकत घेतले नसते तर जागतिकस्तरावर इंधनाची किंमत सर्वांसाठी २०० डॉलरपर्यंत वाढली असती.

रशियातील इंधनावर कोणतेही निर्बंध नसल्याचे केंद्रीय मंत्री पुरी यांनी म्हटले आहे.'रशियन इंधन खरेदी करून भारताने संपूर्ण जगावर उपकार केले आहेत, कारण आम्ही तसे केले नसते तर जागतिक किंमत प्रति बॅरल २०० डॉलरने वाढली असती. रशियन तेलावर कधीही बंदी नव्हती, फक्त किंमतीची मर्यादा होती. भारतीय कंपन्यांनी याचे पालन केले आहे, असं पुरी म्हणाले.

अपूर्ण माहिती असलेल्यांनी हे विसरू नये की त्यांनी भारतावर निर्बंध लादण्याची चर्चा केली होती. अनेक युरोपियन, आशियाई देशांनी अब्जावधी डॉलर्सचे कच्चे तेल, डिझेल, एलएनजी आणि दुर्मिळ खनिजे खरेदी केली आहेत. आमच्या तेल कंपन्यांना जो सर्वोत्तम दर देईल त्यांच्याकडून आम्ही ऊर्जा खरेदी करत राहू, असेही हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा हा विश्वास आहे. दररोज पेट्रोल पंपांना भेट देणाऱ्या आमच्या सात कोटी नागरिकांची उपलब्धता आणि सातत्य आम्हाला सुनिश्चित करण्याची गरज आहे. हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य असल्याचे पुरींनी म्हटलं.

भारत हा एकमेव सर्वात मोठा ग्राहक आहे, जेथे इतर देशांमध्ये अभूतपूर्व जागतिक किमतीत वाढ झाल्यानंतर ३ वर्षांत तेलाच्या किमती झपाट्याने घसरल्या आहेत.' विशेष बाब म्हणजे भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आहे, जो आपल्या गरजेच्या ८० टक्के गरजांसाठी परदेशातून खरेदीवर अवलंबून आहे, असेही पुरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतPetrolपेट्रोल