शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पाकचे मंत्री बरळले; बिलावल भुट्टोच्या वक्तव्यावर भारताने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 06:51 IST

बिलावल यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांना पंतप्रधान होईपर्यंत अमेरिकेत येण्यास बंदी होती.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या अशोभनीय वक्तव्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत त्यांना फटकारले आहे. भुट्टो यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असभ्य भाषेत टीका केली होती.

बिलावल यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांना पंतप्रधान होईपर्यंत अमेरिकेत येण्यास बंदी होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्रमंत्री आहेत, अशी टीका केली होती. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला फटकारल्यानंतर बिलावल भुट्टो यांचा तिळपापड झाला. त्यातून त्यांनी ही टीका केली. 

‘पाकिस्तान म्हणजे दहशतवादाचा केंद्रबिंदू’ जग पाककडे ‘दहशतवादाचा केंद्रबिंदू’ म्हणून पाहते. त्याने चांगला शेजारी बनण्याचा प्रयत्न करावा, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले. ‘जे लोक आपल्या परसात साप पाळतात, त्यांनाच ते चावतात,’ या क्लिंटन यांच्या सल्ल्याचीही जयशंकर यांनी आठवण करून दिली. 

पाकची पातळी दिसलीnबिलावल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदविला. भारताने त्यांच्या वक्तव्याला ‘असंस्कृत’ म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, या टिप्पण्यांमधून पाकिस्तानची पातळी किती आहे, ते भारताविरुद्ध विष ओकण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, हे दिसून येते. nबिलावल भुट्टो १९७१ साल विसरले आहेत; जेव्हा पाकिस्तान सरकारने बंगाली आणि हिंदूंची कत्तल केली होती; दुर्दैवाने आजपर्यंत पाकिस्तानच्या अल्पसंख्याकांबद्दलच्या दृष्टिकोनात फारसा बदल झालेला नाही आणि ते भारतावर आरोप करीत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी