शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 05:36 IST

भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती. 

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील महत्त्वपूर्ण करारानंतर पूर्व लडाखमधील डेमचोक आणि डेपसांग या संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांवरून सैन्य मागे घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास मदत होणार आहे. लष्कराच्या सूत्रांनी २५ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, २८ ते २९ ऑक्टोबरपर्यंत सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. कराराच्या रूपरेषेवर प्रथम राजनैतिक पातळीवर स्वाक्षरी करण्यात आली आणि त्यानंतर लष्करी पातळीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती. 

या प्रक्रियेबाबत एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांवरून माघारी आता अंतिम टप्प्यात आहे. लष्करातील सूत्रांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांबाबत करार झाला आहे आणि इतर क्षेत्रांसाठी चर्चा अद्याप सुरू आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेली लष्करी माघार पूर्ण झाल्यानंतर या भागात गस्त सुरू होईल. त्यानंतर दोन्ही बाजू आपले सैन्य मागे घेतील आणि तात्पुरते बांधकाम आदी नष्ट करतील. या भागात गस्त घालण्याची परिस्थिती एप्रिल २०२० पूर्वीच्या पातळीवर आणली जाण्याची अपेक्षा आहे.

लष्कराने सज्ज रहावे : जयशंकरवेगाने उदयास येत असलेले भू-राजकीय धोके आणि संधींशी जुळवून घेण्यास तयार राहण्याचे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी लष्करी नेतृत्वाला केले. सैन्य कमांडर संमेलन-२०२४ च्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी ते बोलत होते. “जागतिक आणि भू-राजकीय गुंतागुंत : भारतासाठी संधी आणि सशस्त्र दलांकडून अपेक्षा” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनS. Jaishankarएस. जयशंकर