शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 05:36 IST

भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती. 

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील महत्त्वपूर्ण करारानंतर पूर्व लडाखमधील डेमचोक आणि डेपसांग या संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांवरून सैन्य मागे घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास मदत होणार आहे. लष्कराच्या सूत्रांनी २५ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, २८ ते २९ ऑक्टोबरपर्यंत सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. कराराच्या रूपरेषेवर प्रथम राजनैतिक पातळीवर स्वाक्षरी करण्यात आली आणि त्यानंतर लष्करी पातळीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती. 

या प्रक्रियेबाबत एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांवरून माघारी आता अंतिम टप्प्यात आहे. लष्करातील सूत्रांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांबाबत करार झाला आहे आणि इतर क्षेत्रांसाठी चर्चा अद्याप सुरू आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेली लष्करी माघार पूर्ण झाल्यानंतर या भागात गस्त सुरू होईल. त्यानंतर दोन्ही बाजू आपले सैन्य मागे घेतील आणि तात्पुरते बांधकाम आदी नष्ट करतील. या भागात गस्त घालण्याची परिस्थिती एप्रिल २०२० पूर्वीच्या पातळीवर आणली जाण्याची अपेक्षा आहे.

लष्कराने सज्ज रहावे : जयशंकरवेगाने उदयास येत असलेले भू-राजकीय धोके आणि संधींशी जुळवून घेण्यास तयार राहण्याचे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी लष्करी नेतृत्वाला केले. सैन्य कमांडर संमेलन-२०२४ च्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी ते बोलत होते. “जागतिक आणि भू-राजकीय गुंतागुंत : भारतासाठी संधी आणि सशस्त्र दलांकडून अपेक्षा” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनS. Jaishankarएस. जयशंकर