शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 06:38 IST

सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल, असे जयशंकर म्हणाले.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये  चीनसोबतच्या  प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात असलेल्या सैन्याला युद्धसदृश आक्रमक पवित्र्यातून बाहेर  काढण्याची `समस्या` सुटलेली असल्याने  आता तणाव कमी  करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर  यांनी  शनिवारी सांगितले.

ते म्हणाले, सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल. सैन्य मागे नेणे या प्रक्रियेकडे मी त्याच दृष्टीने बघतो. त्यापेक्षा वेगळा अर्थ काढण्याचा मी प्रयत्न केलेला नाही. 

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरून सैन्य मागे नेण्याबाबत भारत व चीनमध्ये २१ ऑक्टोबर रोजी करार झाला होता. त्याबाबत एस. जयशंकर यांनी सांगितले की, या कराराच्या अंमलबजावणीकडे आता लक्ष देण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली. ही घटना भारत व चीनमधील संबंध पुन्हा सुरळीत होण्याची सुरुवात आहे का, या प्रश्नावर जयशंकर यांनी हे उत्तर दिले.

‘सलग तीन वेळा सत्तेवर येणे सर्वसामान्य नाही’

-एस. जयशंकर म्हणाले की, जगात अनेक देशांमध्ये राजकीय अस्थैर्य आहे. मात्र, भारतातील राजकीय स्थैर्याकडे जग आशेने पाहत आहे. 

-एखाद्या देशातील सरकार सलग तीनवेळा सत्तेवर येणे ही सर्वसामान्य गोष्ट नाही. हे भारतात घडले आहे.

-अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प ज्या गोष्टींचा प्रचार करून पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले होते, त्या समस्या त्यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातही कायम आहेत.

-किंबहुना या समस्यांनी अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे. रशिया व युक्रेनमधील मतभेदांवर युद्धामुळे नव्हेतर, चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघेल, अशी भारताची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय