शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 06:38 IST

सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल, असे जयशंकर म्हणाले.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये  चीनसोबतच्या  प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात असलेल्या सैन्याला युद्धसदृश आक्रमक पवित्र्यातून बाहेर  काढण्याची `समस्या` सुटलेली असल्याने  आता तणाव कमी  करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर  यांनी  शनिवारी सांगितले.

ते म्हणाले, सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल. सैन्य मागे नेणे या प्रक्रियेकडे मी त्याच दृष्टीने बघतो. त्यापेक्षा वेगळा अर्थ काढण्याचा मी प्रयत्न केलेला नाही. 

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरून सैन्य मागे नेण्याबाबत भारत व चीनमध्ये २१ ऑक्टोबर रोजी करार झाला होता. त्याबाबत एस. जयशंकर यांनी सांगितले की, या कराराच्या अंमलबजावणीकडे आता लक्ष देण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली. ही घटना भारत व चीनमधील संबंध पुन्हा सुरळीत होण्याची सुरुवात आहे का, या प्रश्नावर जयशंकर यांनी हे उत्तर दिले.

‘सलग तीन वेळा सत्तेवर येणे सर्वसामान्य नाही’

-एस. जयशंकर म्हणाले की, जगात अनेक देशांमध्ये राजकीय अस्थैर्य आहे. मात्र, भारतातील राजकीय स्थैर्याकडे जग आशेने पाहत आहे. 

-एखाद्या देशातील सरकार सलग तीनवेळा सत्तेवर येणे ही सर्वसामान्य गोष्ट नाही. हे भारतात घडले आहे.

-अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प ज्या गोष्टींचा प्रचार करून पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले होते, त्या समस्या त्यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातही कायम आहेत.

-किंबहुना या समस्यांनी अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे. रशिया व युक्रेनमधील मतभेदांवर युद्धामुळे नव्हेतर, चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघेल, अशी भारताची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय