शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 06:38 IST

सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल, असे जयशंकर म्हणाले.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये  चीनसोबतच्या  प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात असलेल्या सैन्याला युद्धसदृश आक्रमक पवित्र्यातून बाहेर  काढण्याची `समस्या` सुटलेली असल्याने  आता तणाव कमी  करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर  यांनी  शनिवारी सांगितले.

ते म्हणाले, सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल. सैन्य मागे नेणे या प्रक्रियेकडे मी त्याच दृष्टीने बघतो. त्यापेक्षा वेगळा अर्थ काढण्याचा मी प्रयत्न केलेला नाही. 

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरून सैन्य मागे नेण्याबाबत भारत व चीनमध्ये २१ ऑक्टोबर रोजी करार झाला होता. त्याबाबत एस. जयशंकर यांनी सांगितले की, या कराराच्या अंमलबजावणीकडे आता लक्ष देण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली. ही घटना भारत व चीनमधील संबंध पुन्हा सुरळीत होण्याची सुरुवात आहे का, या प्रश्नावर जयशंकर यांनी हे उत्तर दिले.

‘सलग तीन वेळा सत्तेवर येणे सर्वसामान्य नाही’

-एस. जयशंकर म्हणाले की, जगात अनेक देशांमध्ये राजकीय अस्थैर्य आहे. मात्र, भारतातील राजकीय स्थैर्याकडे जग आशेने पाहत आहे. 

-एखाद्या देशातील सरकार सलग तीनवेळा सत्तेवर येणे ही सर्वसामान्य गोष्ट नाही. हे भारतात घडले आहे.

-अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प ज्या गोष्टींचा प्रचार करून पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले होते, त्या समस्या त्यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातही कायम आहेत.

-किंबहुना या समस्यांनी अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे. रशिया व युक्रेनमधील मतभेदांवर युद्धामुळे नव्हेतर, चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघेल, अशी भारताची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय