शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सीमेवर पुन्हा भिडले भारत-चीन सैनिक; चौकीला ३०० चिनी सैनिकांनी घेरलेले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 05:32 IST

घुसखोरी रोखताना ६ भारतीय जवान जखमी, रक्तरंजित संघर्ष टळला

लोकमत न्यूज नेटवर्क    नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तवांग क्षेत्रात भारत व चीनच्या सैनिकांमध्ये गेल्या शुक्रवारी, ९ डिसेंबर रोजी संघर्ष झाल्याचे वृत्त असून त्यात दोन्ही देशांचे काही सैनिक किरकोळ जखमी झाले. त्यापैकी ६ जखमी भारतीय जवानांना उपचारांसाठी गुवाहाटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात  रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांत झालेली ही पहिलीच चकमक आहे.

गेल्या शुक्रवारी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. यावेळी झालेल्या संघर्षात दोन्ही देशांचे काही जवान जखमी झाले. पण त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून आणखी रक्तरंजित होऊ शकणारा संघर्ष रोखला. या घटनेनंतर तवांग क्षेत्रातील भारतीय कमांडर व चिनी अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मीटिंग होऊन या संघर्षाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

कायम तणाव n गलवान खोऱ्यात १५ जून २०२० रोजी मध्यरात्रीनंतर भारत व चीन यांच्या सैनिकांत संघर्ष झाला होता. त्यात चीनचे ४० सैनिक ठार व भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. व्यापारी संबंधांवरही विपरित परिणाम झाला. n पूर्व लडाखमध्ये पॅन्गाँग तलावाच्या परिसरात भारत व चीनचे सैनिक ५ मे २०२० पासून समोरासमोर उभे ठाकले. चिनी सैनिक या भागात भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याला भारतीय सैनिकांनी अटकाव केला होता.

गेल्या वर्षीही कुरापतगेल्या वर्षी अरुणाचल प्रदेशमधील तवांग क्षेत्रामध्ये २०० चिनी सैनिकांनी घुसखोरीचा केलेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. त्यावेळीदेखील दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी चर्चा केली व आपापल्या सैनिकांना माघारी जाण्याचे आदेश दिले होते. सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा निर्मितीवर भरn सीमावर्ती भागात उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत अधिक लक्ष केंद्रित केले आहे. n ४० हजार कोटी खर्च करून फ्रंटियर हायवे बांधण्याचे काम हाती घेतले. अरुणाचल प्रदेश, लडाख आदी ठिकाणी चीन भारताच्या सतत कुरापती काढत आहे. त्या देशाच्या विस्तारवादी भूमिकेला चोख प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. त्यामुळे ईशान्य भारत असो वा अन्य सीमावर्ती राज्ये तिथे पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. 

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndian Armyभारतीय जवान