शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

नाद करा, पण आमचा कुठं! जिनपिंग यांचा हट्ट लडाखच्या थंडीत चिनी सैन्याला महागात पडणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 10:45 IST

-३० डिग्री तापमानात ५० हजार जवान; चीनला संघर्ष भारी पडणार

नवी दिल्ली: चीनच्या आडमुठेपणामुळे पूर्व लडाख सीमेवरील तणाव कायम आहे. चीनच्या कुरापतींचा मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज आहे. संघर्ष झाल्यास भारताचा पराभव निश्चित, आम्ही कोणताही दबाव घेणार नाही, अशी दर्पोक्ती चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्रानं केली. सध्याच्या घडीला सीमेवर दोन्ही बाजूंनी ५० हजार जवान तैनात आहेत. सीमेवरील तणाव निवळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे हिवाळ्यातही दोन्ही बाजूनं सैन्य तैनात असेल. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा हट्ट चिनी सैनिकांना महागात पडू शकतो. यामागे अनेक कारणं आहेत.

बर्फाळ आणि उंच भागांमध्ये सरावाचा अभावहिवाळ्यात पूर्व लडाखमधील तापमान उणे ३० डिग्रीपर्यंत घसरेल. लडाखमधील भीषण थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता चिनी सैनिकांसाठी जीवघेणी ठरू शकते. चिनी सैनिकांना आताच पोटाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. याच आजारामुळे चिनी लष्कराच्या सर्वात मोठ्या पश्चिम थिएटर कमांडचे कमांडर राहिलेल्या झांग जुडोंग यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना अवघे ६ महिनेच लडाखमधील आव्हानात्मक स्थितीचा सामना करता आला. चीननं गेल्या ९ महिन्यांत तीनदा पश्चिम थिएटर कमांडचे कमांडर बदलले आहेत. पश्चिम थिएटर कमांडचं मुख्यालय तिबेटमध्ये आहे. या कमांडवर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतची जबाबदारी आहे.

भारतीय जवान चीनवर भारी पडणारभारतीय लष्कराचे जवान उंच भागांमध्ये होणाऱ्या युद्धांत अतिशय निष्णात आणि तरबेज असल्याचं वॉशिंग्टनस्थित अमेरिकन सुरक्षा केंद्राच्या अभ्यासातून समोर आलं आहे. या बाबतीत चिनी सैनिक भारताच्या आसपासदेखील टिकत नाहीत. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेलं युद्धक्षेत्र अशी ओळख असलेल्या सियाचिनमध्ये भारतीय जवान पाय रोवून उभे आहेत. दुर्गम डोंगराळ भागांत भारतीय जवान युद्धाचा सराव करतात. सियाचिनमधील परिस्थिती लडाखपेक्षा कितीतरी पट अधिक आव्हानात्मक आहे. त्यामुळे संघर्ष झाल्यास भारतीय जवान मोठी आघाडी घेऊ शकतात.

टूटू रेजिमेंटमध्ये भारताकडे आघाडीलडाखमधील अवघड भौगोलिक स्थितीत संघर्ष झाल्यास भारताच्या टूटू रेजिमेंटची स्थिती उत्तम आहे. या रेजिमेंटची फारशी माहिती कोणाकडेच नाही. या रेजिमेंटचं काम अतिशय गोपनीयरित्या चालतं. यामध्ये आधी तिबेटींचा भरणा होता. आता गोरखा जवानदेखील या रेजिमेंटचा भाग आहेत. या रेजिमेंटची स्थापना १९६२ मध्ये झाली. रेजिमेंटमध्ये स्थानिकांचं प्रमाण खूप आहे. त्यांना तिथल्या परिस्थितीची अतिशय उत्तम जाण आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindia china faceoffभारत-चीन तणाव