शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

नाद करा, पण आमचा कुठं! जिनपिंग यांचा हट्ट लडाखच्या थंडीत चिनी सैन्याला महागात पडणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 10:45 IST

-३० डिग्री तापमानात ५० हजार जवान; चीनला संघर्ष भारी पडणार

नवी दिल्ली: चीनच्या आडमुठेपणामुळे पूर्व लडाख सीमेवरील तणाव कायम आहे. चीनच्या कुरापतींचा मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज आहे. संघर्ष झाल्यास भारताचा पराभव निश्चित, आम्ही कोणताही दबाव घेणार नाही, अशी दर्पोक्ती चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्रानं केली. सध्याच्या घडीला सीमेवर दोन्ही बाजूंनी ५० हजार जवान तैनात आहेत. सीमेवरील तणाव निवळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे हिवाळ्यातही दोन्ही बाजूनं सैन्य तैनात असेल. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा हट्ट चिनी सैनिकांना महागात पडू शकतो. यामागे अनेक कारणं आहेत.

बर्फाळ आणि उंच भागांमध्ये सरावाचा अभावहिवाळ्यात पूर्व लडाखमधील तापमान उणे ३० डिग्रीपर्यंत घसरेल. लडाखमधील भीषण थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता चिनी सैनिकांसाठी जीवघेणी ठरू शकते. चिनी सैनिकांना आताच पोटाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. याच आजारामुळे चिनी लष्कराच्या सर्वात मोठ्या पश्चिम थिएटर कमांडचे कमांडर राहिलेल्या झांग जुडोंग यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना अवघे ६ महिनेच लडाखमधील आव्हानात्मक स्थितीचा सामना करता आला. चीननं गेल्या ९ महिन्यांत तीनदा पश्चिम थिएटर कमांडचे कमांडर बदलले आहेत. पश्चिम थिएटर कमांडचं मुख्यालय तिबेटमध्ये आहे. या कमांडवर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतची जबाबदारी आहे.

भारतीय जवान चीनवर भारी पडणारभारतीय लष्कराचे जवान उंच भागांमध्ये होणाऱ्या युद्धांत अतिशय निष्णात आणि तरबेज असल्याचं वॉशिंग्टनस्थित अमेरिकन सुरक्षा केंद्राच्या अभ्यासातून समोर आलं आहे. या बाबतीत चिनी सैनिक भारताच्या आसपासदेखील टिकत नाहीत. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेलं युद्धक्षेत्र अशी ओळख असलेल्या सियाचिनमध्ये भारतीय जवान पाय रोवून उभे आहेत. दुर्गम डोंगराळ भागांत भारतीय जवान युद्धाचा सराव करतात. सियाचिनमधील परिस्थिती लडाखपेक्षा कितीतरी पट अधिक आव्हानात्मक आहे. त्यामुळे संघर्ष झाल्यास भारतीय जवान मोठी आघाडी घेऊ शकतात.

टूटू रेजिमेंटमध्ये भारताकडे आघाडीलडाखमधील अवघड भौगोलिक स्थितीत संघर्ष झाल्यास भारताच्या टूटू रेजिमेंटची स्थिती उत्तम आहे. या रेजिमेंटची फारशी माहिती कोणाकडेच नाही. या रेजिमेंटचं काम अतिशय गोपनीयरित्या चालतं. यामध्ये आधी तिबेटींचा भरणा होता. आता गोरखा जवानदेखील या रेजिमेंटचा भाग आहेत. या रेजिमेंटची स्थापना १९६२ मध्ये झाली. रेजिमेंटमध्ये स्थानिकांचं प्रमाण खूप आहे. त्यांना तिथल्या परिस्थितीची अतिशय उत्तम जाण आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindia china faceoffभारत-चीन तणाव