शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: आपल्या हद्दीत राहा! भारताने चीनला खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:28 IST

देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच चीनने आपल्या हालचाली आपल्या हद्दीतच मर्यादित ठेवाव्यात

ठळक मुद्देद्विपक्षीय मतभेदांबाबत शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा, असे भारताचे मत मात्र परिस्थितीनुसार प्रत्येक प्रकारची कारवाई करण्यास भारत तयार आम्ही भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध आहोत

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान क्षेत्रात झालेल्या झटापटीनंतर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. या तणावाच्या वातावरणादरम्यान, देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच चीनने आपल्या हालचाली आपल्या हद्दीतच मर्यादित ठेवाव्यात, असे भारताने चीनला सुनावले आहे.

भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, द्विपक्षीय मतभेदांबाबत शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा, असे भारताचे मत आहे. मात्र परिस्थितीनुसार प्रत्येक प्रकारची कारवाई करण्यास भारत तयार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने आज वंदे भारत मिशनबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र यावेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांवर प्रसारमाध्यमांकडून सध्या भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादाबाबत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. तेव्हा अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, सीमाभागांमध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण कायम राहण्याचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. तसेच सर्व मतभेदांचे चर्चेच्या माध्यमातून निराकरण व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र काल पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध आहोत.’’

सीमारेषेवर चीनने आपल्या हालचाली, त्यांच्या सीमेच्या मर्यादेत राहून करेल, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संवाद अद्याप थांबलेला नाही. विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. त्याअंतर्गत दोन्ही देशांमध्ये आज मेजर जनरल स्तरावरील बैठक झाली. ही बैठक सुमारे सहा तास चालली. मात्र त्यातून काही तोडगा निघाला नाही.  

टॅग्स :IndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय