शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

India China FaceOff: आपल्या हद्दीत राहा! भारताने चीनला खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:28 IST

देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच चीनने आपल्या हालचाली आपल्या हद्दीतच मर्यादित ठेवाव्यात

ठळक मुद्देद्विपक्षीय मतभेदांबाबत शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा, असे भारताचे मत मात्र परिस्थितीनुसार प्रत्येक प्रकारची कारवाई करण्यास भारत तयार आम्ही भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध आहोत

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान क्षेत्रात झालेल्या झटापटीनंतर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. या तणावाच्या वातावरणादरम्यान, देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच चीनने आपल्या हालचाली आपल्या हद्दीतच मर्यादित ठेवाव्यात, असे भारताने चीनला सुनावले आहे.

भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, द्विपक्षीय मतभेदांबाबत शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा, असे भारताचे मत आहे. मात्र परिस्थितीनुसार प्रत्येक प्रकारची कारवाई करण्यास भारत तयार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने आज वंदे भारत मिशनबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र यावेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांवर प्रसारमाध्यमांकडून सध्या भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादाबाबत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. तेव्हा अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, सीमाभागांमध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण कायम राहण्याचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. तसेच सर्व मतभेदांचे चर्चेच्या माध्यमातून निराकरण व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र काल पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध आहोत.’’

सीमारेषेवर चीनने आपल्या हालचाली, त्यांच्या सीमेच्या मर्यादेत राहून करेल, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संवाद अद्याप थांबलेला नाही. विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. त्याअंतर्गत दोन्ही देशांमध्ये आज मेजर जनरल स्तरावरील बैठक झाली. ही बैठक सुमारे सहा तास चालली. मात्र त्यातून काही तोडगा निघाला नाही.  

टॅग्स :IndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय