शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

India China FaceOff: केंद्र सरकारनं ‘या’ कायद्यात केली दुरुस्ती; चिनी कंपन्यांना मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 08:26 IST

चीनसोबत सुरु असलेल्या वादातून भारताने सर्वप्रथम चीन आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी ५९ अँप्सना देशात बंदी आणली

ठळक मुद्देचीनला आणखी एक धक्का, सरकारी खरेदीच्या प्रक्रियेतून बाहेर काढलंसरकारी खरेदी प्रक्रियातील बोली लावण्याचे नियम बदललेचीनसह अन्य भारतीय सीमेला लागून असलेल्या देशांसाठी नवा नियम लागूकेंद्र सरकारच्या या नियमांचे पालन करणे राज्य सरकारही बंधनकारक

नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला, कोणत्याही परिस्थितीत भारत सीमेचं रक्षण करण्यास समर्थ आहे असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला दिला होता, त्याचसोबत त्यांनी स्वत: चीन संघर्षातील जखमी जवानांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती.

चीनसोबत सुरु असलेल्या वादातून भारताने सर्वप्रथम चीन आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी ५९ अँप्सना देशात बंदी आणली. त्यानंतर अनेक प्रकल्पातील चिनी कंपन्यांची भागीदारी कमी केली, ताज्या निर्णयानुसार केंद्र सरकारने सरकारी खरेदी प्रक्रियेत चिनी कंपन्यांना बंदी आणली आहे. म्हणजे, केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणत्याही खरेदी प्रक्रियेत चिनी कंपन्यांना बोलीमध्ये सहभागी होता येणार नाही.

केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत जनरल फायनॅन्शियल अधिकार २०१७ च्या कायद्यात दुरुस्ती केली आहे. ज्याचा परिणाम भारताच्या सीमेला लागून असलेल्या देशांवर होतो. यात चीन, पाकिस्तान, बांगलादेश, भूटान आणि नेपाळ यांच्यावर थेट परिणाम होणार आहे. सरकारी खरेदीत चायनीज कंपन्यांचा बोलबाला होता. केंद्रीय वित्त नियोजन विभागाने या नियमांनुसार, भारतीय संरक्षण व राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी सार्वजनिक खरेदीसंदर्भात सविस्तर आदेश जारी केला आहे.

नवीन नियमांतर्गत, भारत सीमेला लागून असलेल्या देशांकडून बोली लावलेल्या कंपन्या सक्षम प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असल्यासच वस्तू व सेवांसाठी बोली लावण्यास पात्र असतील. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन (डीपीआयआयटी) विभागाच्या वतीने सक्षम प्राधिकरण स्थापन केले जाईल. त्यासाठी परराष्ट्र व गृह मंत्रालयाकडूनही मान्यता घेणे आवश्यक आहे. सरकारचा हा आदेश सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्था, स्वायत्त संस्था, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (सीपीएसई) आणि सरकार किंवा त्याच्या उपक्रमांकडून आर्थिक सहाय्य मिळविणार्‍या सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांना लागू आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना लेखी आदेशात म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात राज्य सरकारही महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. अशा परिस्थितीत सरकारने घटनेचा कलम 257 (1) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ, सरकारचा हा आदेश राज्य सरकार आणि सॅन्टेट उपक्रमांच्या खरेदीवर देखील लागू आहे.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनCentral Governmentकेंद्र सरकार