शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: चिनी खाद्यपदार्थांवर बंदीचे आवाहन प्रक्षोभक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 02:16 IST

India China FaceOff: रामदास आठवले यांनी केलेले आवाहन प्रक्षोभक आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

नवी दिल्ली : देशातील हॉटेलांमधून चिनी खाद्यपदार्थांची विक्री करण्यास बंदी घालावी, लोकांनी या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालावा, असे केंद्रीय समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेले आवाहन प्रक्षोभक आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केली आहे. लडाखमधील गलवान खोºयात चिनी लष्कराशी झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले होते.व्हेज, नॉनव्हेज मंचुरियन राईस, गोबी मंचुरियन असे अनेक चिनी पदार्थ खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत असतात. आठवले यांच्या वक्तव्याबद्दल काही नेटकऱ्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, देशातील हॉटेलामध्ये मिळणारे चिनी खाद्यपदार्थ खरेतर भारतीय पद्धतीने बनविले जातात. या खाद्यपदार्थांवर बंदी घातल्यास, ते बनविण्यासाठी राबणारे हजारो हात बेकार होतील. देशाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या साथीमुळे मोठा फटकाबसला आहे. त्यातच असे निर्णय घेतले तर बेरोजगारांचेही प्रमाण वाढेल. पत्रकार मोहम्मद झुबैर यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, चिनी खाद्यपदार्थांची बहुतांश हॉटेल ईशान्य भारतातील लोकांकडून चालविली जातात किंवा हॉटेलात हे खाद्यपदार्थ बनविणाºयांंमध्ये त्या लोकांचे प्रमाण मोठे आहे. चिनी खाद्यपदार्थांवर बंदी घाला हे केंद्रीय समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांचे विधान अतिशय धोकादायक आहे. अशा विधानांमुळे चिनी खाद्यपदार्थ विकणारे किंवा ते बनविणाºयांवर हल्लेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.>कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर रामदास आठवले यांनी केलेली ‘गो कोरोना गो’ ही घोषणा देशभरात चर्चेचा विषय बनली होती. त्यानंतर आता आठवले यांनी चिनी खाद्यपदार्थांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. लेखक सिद्धार्थ सिंह यांनी म्हटले आहे की, देशातील अनेकांच्या हातांना सध्या काम नाही. त्यामुळे अशा बेकारांचे तांडे चिनी खाद्यपदार्थ विकणाºया हॉटेलांवर किंवा रस्त्यावर त्या खाद्यपदार्थांची गाडी चालविण्यावर हल्लेही करू शकतात.>धोकादायक विधाने चुकीचीचिनी खाद्यपदार्थांवर बंदी घाला हे केंद्रीय समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांचे विधान अतिशय धोकादायक आहे. अशा विधानांमुळे चिनी खाद्यपदार्थ विकणारे किंवा ते बनविणाºयांवर हल्लेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले