शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

India China FaceOff: मोठी बातमी! गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या ७६ जवानांची प्रकृती स्थिर; सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 23:15 IST

तर उर्वरित ५८ जवान इतर रुग्णालयात उपचार घेत आहेत, या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.

नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशातील सैनिकांच्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या ४३ सैनिकांचीही मोठी हानी झाली. भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे सध्या देशभरात चीनविरोधात संतापाची लाट आहे.

भारत आणि चीन यांच्या सैनिकात गलवान खोऱ्यात झटापट झाली. यामध्ये २० जवान शहीद झाले तर इतर ७६ जवान जखमी झाले. सुदैवाने सध्या या जखमींपैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. न्यूज एजेन्सी एएनआयने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. भारताचे १८ जवान लेहच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील १५ दिवसांत हे जवान पुन्हा ड्युटीवर कार्यरत होतील असं सांगितलं आहे.

तर उर्वरित ५८ जवान इतर रुग्णालयात उपचार घेत आहेत, या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. या ५८ जवानांना ड्युटीवर पुन्हा परतण्यास एक आठवड्याचा कालावधी जाईल अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान चीन आणि भारतातील मेजर जनरलांनी सलग तिसर्‍या दिवशी गलवान वाद सोडविण्यासाठी बैठक घेतली. ही बैठक गुरुवारी सुमारे ६ तास चालली. गलवान व्हॅलीच्या जवळ ही बैठक झाली. यापूर्वी बुधवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही.

गलवानच्या घटनेसाठी भारताने दोन दिवसांत दुसऱ्यांदा चीनला दोष दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या मुत्सद्दी व सैन्य स्तरीय चर्चा सुरू आहे. ६ जूनला कमांडरांचा संवाद झाला. या बैठकीत सहमती झाली होती, त्याचं पालन चीनने करायला हवं होतं. १५ जूनच्या रात्री जे झालं त्यासाठी चीन जबाबदार आहे. जर त्यांनी उच्चस्तरीय बैठकीत जे ठरलं आहे ते लक्षात ठेवलं असतं तर हे नुकसान झालं नसतं. तसेच २३ जून रोजी रशिया, चीन आणि भारत यांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर सहभागी होतील असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले आहेत.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन