शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

India China FaceOff: मोठी बातमी! गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या ७६ जवानांची प्रकृती स्थिर; सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 23:15 IST

तर उर्वरित ५८ जवान इतर रुग्णालयात उपचार घेत आहेत, या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.

नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशातील सैनिकांच्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या ४३ सैनिकांचीही मोठी हानी झाली. भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे सध्या देशभरात चीनविरोधात संतापाची लाट आहे.

भारत आणि चीन यांच्या सैनिकात गलवान खोऱ्यात झटापट झाली. यामध्ये २० जवान शहीद झाले तर इतर ७६ जवान जखमी झाले. सुदैवाने सध्या या जखमींपैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. न्यूज एजेन्सी एएनआयने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. भारताचे १८ जवान लेहच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील १५ दिवसांत हे जवान पुन्हा ड्युटीवर कार्यरत होतील असं सांगितलं आहे.

तर उर्वरित ५८ जवान इतर रुग्णालयात उपचार घेत आहेत, या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. या ५८ जवानांना ड्युटीवर पुन्हा परतण्यास एक आठवड्याचा कालावधी जाईल अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान चीन आणि भारतातील मेजर जनरलांनी सलग तिसर्‍या दिवशी गलवान वाद सोडविण्यासाठी बैठक घेतली. ही बैठक गुरुवारी सुमारे ६ तास चालली. गलवान व्हॅलीच्या जवळ ही बैठक झाली. यापूर्वी बुधवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही.

गलवानच्या घटनेसाठी भारताने दोन दिवसांत दुसऱ्यांदा चीनला दोष दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या मुत्सद्दी व सैन्य स्तरीय चर्चा सुरू आहे. ६ जूनला कमांडरांचा संवाद झाला. या बैठकीत सहमती झाली होती, त्याचं पालन चीनने करायला हवं होतं. १५ जूनच्या रात्री जे झालं त्यासाठी चीन जबाबदार आहे. जर त्यांनी उच्चस्तरीय बैठकीत जे ठरलं आहे ते लक्षात ठेवलं असतं तर हे नुकसान झालं नसतं. तसेच २३ जून रोजी रशिया, चीन आणि भारत यांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर सहभागी होतील असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले आहेत.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन