शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

India China FaceOff: मोठी बातमी! गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या ७६ जवानांची प्रकृती स्थिर; सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 23:15 IST

तर उर्वरित ५८ जवान इतर रुग्णालयात उपचार घेत आहेत, या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.

नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशातील सैनिकांच्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या ४३ सैनिकांचीही मोठी हानी झाली. भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे सध्या देशभरात चीनविरोधात संतापाची लाट आहे.

भारत आणि चीन यांच्या सैनिकात गलवान खोऱ्यात झटापट झाली. यामध्ये २० जवान शहीद झाले तर इतर ७६ जवान जखमी झाले. सुदैवाने सध्या या जखमींपैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. न्यूज एजेन्सी एएनआयने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. भारताचे १८ जवान लेहच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील १५ दिवसांत हे जवान पुन्हा ड्युटीवर कार्यरत होतील असं सांगितलं आहे.

तर उर्वरित ५८ जवान इतर रुग्णालयात उपचार घेत आहेत, या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. या ५८ जवानांना ड्युटीवर पुन्हा परतण्यास एक आठवड्याचा कालावधी जाईल अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान चीन आणि भारतातील मेजर जनरलांनी सलग तिसर्‍या दिवशी गलवान वाद सोडविण्यासाठी बैठक घेतली. ही बैठक गुरुवारी सुमारे ६ तास चालली. गलवान व्हॅलीच्या जवळ ही बैठक झाली. यापूर्वी बुधवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही.

गलवानच्या घटनेसाठी भारताने दोन दिवसांत दुसऱ्यांदा चीनला दोष दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या मुत्सद्दी व सैन्य स्तरीय चर्चा सुरू आहे. ६ जूनला कमांडरांचा संवाद झाला. या बैठकीत सहमती झाली होती, त्याचं पालन चीनने करायला हवं होतं. १५ जूनच्या रात्री जे झालं त्यासाठी चीन जबाबदार आहे. जर त्यांनी उच्चस्तरीय बैठकीत जे ठरलं आहे ते लक्षात ठेवलं असतं तर हे नुकसान झालं नसतं. तसेच २३ जून रोजी रशिया, चीन आणि भारत यांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर सहभागी होतील असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले आहेत.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन