शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

एका क्षणात भारतीय जवान करतील शत्रूचा खात्मा; लडाखच्या सीमेवरुन थेट चीनला ऐकू गेली गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 16:19 IST

कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी पूर्व लडाखमध्ये एलएसीवर सराव घेत आक्रमकपणा दाखवणाऱ्या भारतीय जवानांसोबत संवाद साधला आणि त्यांचा उत्साह वाढवला.

ठळक मुद्देभारत आणि चीन यांच्या सीमेवर मागील वर्षभरापासून वाद सुरु आहेत. चीनने लडाखच्या अक्साई चीन भागातील गलवान खोऱ्यात रस्ते बांधण्याचं काम हाती घेतलं. त्याला भारताने विरोध केला१५ जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसाचार घडला.

नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये चीनसोबत(India-China Faceoff) सुरु असलेल्या सीमावादामुळे भारतीय सैन्याचे जवान नेहमी सतर्कता बाळगतात. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय जवान तयार असतात. जर वाईट हेतूनं शत्रू सीमा पार करण्याचा प्रयत्न करत असेल तर भारतीय जवान डोळे झपकताच त्यांचा खात्मा करतील. याच दरम्यान सैन्याच्या जवानांनी गुरुवार पूर्व लडाखमध्ये अभ्यास सराव करून स्वत:ची क्षमता दाखवली आणि शत्रूला मर्यादेत राहण्याचे संकेत दिले.

१५ हजार फूट उंचीवर सैन्याचा सराव

लडाखच्या सुरक्षेसाठी चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराने(Indian Army) १५ हजार फूट उंचावर असलेल्या परिसरात टँकच्या माध्यमातून क्षमता दाखवली. यावेळी कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन सरावावेळी उपस्थित होते. सरावादरम्यान भारतीय जवानांनी टँक पूर्व लडाखमध्ये दिवसभर चालवले. लष्कराच्या स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या टँकने लक्ष्यावर गोळे उडवून युद्ध लढण्याची त्यांची तयारी दाखवली. लष्कराच्या टी ९० भीष्म आणि टी ७२ अजय सारख्या टँकने सरावावेळी त्यांची मारक क्षमता दाखवली. ज्याची गर्जना सीमेपलीकडे असणाऱ्या चीनच्या सैन्यापर्यंत पोहचली.

कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी पूर्व लडाखमध्ये एलएसीवर सराव घेत आक्रमकपणा दाखवणाऱ्या भारतीय जवानांसोबत संवाद साधला आणि त्यांचा उत्साह वाढवला. भारत आणि चीन यांच्या सीमेवर मागील वर्षभरापासून वाद सुरु आहेत. चीनने लडाखच्या अक्साई चीन भागातील गलवान खोऱ्यात रस्ते बांधण्याचं काम हाती घेतलं. त्याला भारताने विरोध केला. ५ मे २०२० रोजी भारतीय सैन्य आणि चीनी सैन्यात झटापट झाली. त्यानंतर चीन सैनिक ९ मे रोजी सिक्किमच्या नाथूला इथं एकमेकांना भिडले होते. यात अनेक सैनिक जखमी झाले होते. त्यानंतर १५ जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसाचार घडला. यावेळी झालेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचेही बरेच जवान मारले गेले. या झटापटीनंतर चीन आणि भारत यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

चीनची आर्थिक नाडी भारतानं मोडली

भारत चीनसाठी मोठी बाजारपेठ आहे. चीनमध्ये तयार होणारी उत्पादनं मोठ्या प्रमाणात भारतात येतात. मात्र गेल्या काही महिन्यांत भारतानं चीनला मोठा झटका दिला आहे. चीनकडून होणारी निर्यात गेल्या काही महिन्यांत कमी झाली आहे. भारतानं चीनवर असलेलं अवलंबित्व कमी केलं आहे. त्याचा मोठा फटका चीनला बसला आहे. चीनच्या आर्थिक स्थितीवर याचा प्रतिकूल परिणाम दिसत आहे. चिनी उत्पादनांना असलेली मागणी घटली असून हीच परिस्थिती कायम राहण्याचा सीआयसीसीचा अंदाज आहे. सीआयसीसी चीनमधील गुंतवणूक बँक आहे. पुढील काही महिनेदेखील निर्यातीच्या आघाडीवर चीनला धक्के बसणार अशी शक्यता बँकेनं वर्तवली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndian Armyभारतीय जवान