शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

India China FaceOff: भारतीय सीमेजवळ चीननं उभारले ५०० ‘मॉडेल व्हिलेज’; जाणून घ्या ड्रॅगनचा मास्टरप्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 14:12 IST

गलवान घाटीत झालेल्या घटनेनंतर सिक्किम इथं दोन्ही सैन्य एकमेकांना भिडले. परंतु चीनचा स्वभाव पाहून भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे.

ठळक मुद्देडोकलाम फेस ऑफनंतर चीनने सिक्किमजवळील तिबेट इथं स्वत:ची ताकद वाढवण्यास सुरुवात केलीचीनने सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात वेगाने बांधकाम करण्यास सुरुवातया मॉडेल गावाचं बांधकाम चीनने अगदी हुशारीने केले आहे. जेणेकरून बंकर म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो

नवी दिल्ली – भारताच्या सीमेवर चीननं आतापर्यंत ५०० मॉडेल गाव उभारले आहेत. मॉडेल गावाच्या आडून चीन सैन्याचं बंकर बनवत आहे. गावच्या विकासातून मागून सीमेपर्यंत पक्के रस्ते तयार करुन घेत आहे. तर सिक्किममध्ये भारत, चीन आणि भूतान यांच्यात डोकलाम इथं फेस ऑफनंतर भारत-चीन यांच्या सैन्यात चकमक सुरुच आहे. मागील ६ महिन्यात भारत-चीन दोन्ही सैन्य एकमेकांच्या आमनेसामने आले आहेत. परंतु लष्कराकडून याबाबत कुठलीही माहिती जाहीर करण्यात येत नाही.

गलवान घाटीत झालेल्या घटनेनंतर सिक्किम इथं दोन्ही सैन्य एकमेकांना भिडले. परंतु चीनचा स्वभाव पाहून भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे. डोकलाम फेस ऑफनंतर चीनने सिक्किमजवळील तिबेट इथं स्वत:ची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. चीनने सिक्किमनजीक २०१७ पासून वेगाने रस्ते आणि बांधकामाला सुरुवात केली आहे. भारतीय लष्करी सूत्रांनुसार, भारत-चीन यांच्यातील तणावाची सुरुवात सिक्किमच्या नाकुला इथं झाली. त्यानंतर डोकलाम आणि गलवान इथे झटापट झाली.

अशावेळी चीनने सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात वेगाने बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. डोकलाम इथं चिनींचा डाव उधळला त्यानंतर गलवानमध्येही चीनला पळता भुई केली. त्यामुळे चीनने आता सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. आता चीनने भारत सीमेवर मूळ तिबेटी लोकांना तैनात केले आहे. विशेषत: इतक्या उंचीवर लढाई करण्यासाठी मूळ तिबेटी लोक चिनी सैन्यापेक्षा माहीर आहेत. चीनने भारत सीमेवर मॉडेल व्हिलेज बनवण्यास सुरुवात केली आहे. केवळ उत्तर सिक्किम सीमेजवळ चीनने ३ मॉडेल गाव तयार केले आहेत.

मूळ तिबेटी लोकांना वसवण्याची योजना

या मॉडेल गावात मूळचे तिबेटी असलेल्या लोकांना वसवण्याची योजना आहे. परंतु या मॉडेल गावाचं बांधकाम चीनने अगदी हुशारीने केले आहे. जेणेकरून बंकर म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. परंतु भारत चीनच्या या करकुतींना जाणून आहे. त्यामुळे भारतानेही तयारी सुरु केली आहे. उत्तर सिक्किम इथे एकमेव तिबेटी पठार भारतीय सीमेत आहे. याठिकाणी भारतीय बंकर पूर्ण तयारीत आहेत. चीनच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात आहे. प्रत्येक अत्याधुनिक हत्यारं याठिकाणी भारतीय सैन्याला देण्यात आली आहेत.

परंतु या पठारावर केवळ चीनशी मुकाबला नाही तर हवामानही मोठा शत्रू आहे. भारतीय सैन्याचे बंकर १६ हजार ते २० हजार फूट उंचावर आहेत. इतक्या उंचीवर ऑक्सिजनची पातळीही कमी होते. अतिशय थंड वातावरण जीवघेणं ठरू शकतं. त्यासाठी जवानांना विशेष ट्रेनिंग दिली जाते. त्याचसोबत रोटेशनपद्धतीने त्यांची ड्यूटी लावली जाते. याठिकाणी बोफोर्स, अर्जुन टँक तैनात केलेत. भारताची सीमा चार देशांना लागून आहे. भुतान, नेपाळ, बांगलादेश आणि चीन. यात सर्वात धोकादायक चीन आणि सिक्किम सीमेपासून २२६ किमी अंतरावर जास्त धोका आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनIndiaभारत