शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

India China FaceOff: इंच-इंच भूमी लढवण्यासाठीच लष्कराला मुक्त कारवाईची मुभा; चीनविरोधात युद्धाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:15 IST

India China FaceOff: गलवान खोऱ्यातील झटापटीत भारतीय जवानांवर तार गुंडाळलेल्या दांडुक्याने भ्याड हल्ला पीएलएच्या सैनिकांनी केल्यामुळे हा बदल होण्याची शक्यता आहे.

टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : चिनी ड्रॅगनचा उद्दामपणा ठेचून काढण्याची पूर्ण तयारी भारताने केली आहे. लष्करी सामर्थ्यात भिन्नता असली तरी इंच-इंच भूभागाच्या रक्षणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करास दिले. तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसमवेत त्यांची दिल्लीत चर्चा झाली. झटापटीत हत्यार न वापरण्याच्या करारातही बदल करण्यावर भारताकडून विचार सुरू आहे. मात्र त्यास दुजोरा मिळाला नाही. गलवान खोऱ्यातील झटापटीत भारतीय जवानांवर तार गुंडाळलेल्या दांडुक्याने भ्याड हल्ला पीएलएच्या सैनिकांनी केल्यामुळे हा बदल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भारताकडून थेट युद्धसज्जतेचा इशारा दिल्यासारखे होईल, त्यामुळे या निर्णयावर चर्चा सुरू आहे.>आपल्याही ताब्यात चिनी जवान?चीनचे दात घशात घालण्यासाठी भारतीय लष्करानेही लद्दाख सीमेवर शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. ड्रॅगन कितीही फुत्कारला तरी उत्तर देण्यास लष्कर सज्ज आहे. ‘१५ जूनला झालेल्या झटापटीत चीनचे जवानही मारले गेले. त्यांचे जवान अद्याप आपल्या ताब्यात आहेत. आपण काही जवानांना सोडल्यानंतर त्यांनी आपल्या जवानांना सोडल्याचा खळबळजनक दावा, माजी लष्करप्रमुख वी. के. सिंह यांनी केला. घुसखोरीचा कट रचणाºया चीनचे मनसुबे लष्कराने उद्ध्वस्त करून चिनी सैन्याला यातून कठोर संदेश दिला.>पेगाँग सरोवराभोवती घिरट्याआता ड्रॅगन पेगाँग सरोवराभोवती घिरट्या घालत आहे. तर भारतीय हद्दीत इंचभर पाऊल चीनने सरकवले तरी हवे तसे प्रत्युत्तर देण्याची मुभा भारतीय लष्करास केंद्राने दिली आहे. चीनचा कावेबाजपणा सुरूच आहे. भारताची इंडो तिबेट सीमा पोलिसांच्या जवानांना लद्दाखमध्ये पाठवण्याची तयारी आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असणाºया जवानांनी संख्या वाढवली जाणार आहे. सध्या विविध सीमेवर १८० पोस्टवर हे जवान तैनात आहे. एकूण २ हजार जवानांना सीमेवर तैनात केले जातील.>५०० कोटींपर्यंत साहित्य खरेदीची परवानगीसंरक्षण सज्जतेसाठी संरक्षण मंत्रालयाने लष्करात ५०० कोटी रुपयांपर्यंत साहित्य खरेदीची परवानगी दिली आहे. त्यात जवानांच्या पोषाखापासून काही हत्यारांचाही समावेश आहे. ही खरेदी तात्काळ केली जाईल.लष्कराने इतर सीमांवरही गस्त वाढवली आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ईशान्येकडील राज्यांमध्ये जवानांची संख्या वाढली असून सागरी सीमेवरही युद्धनौका सज्ज आहेत. हा निर्णय संरक्षण मंत्री व लष्कर प्रमुखांच्या बैठकीत झाला. श्रीनगरमध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन