शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

India-China Conflict: ‘तवांगची परिस्थिती नियंत्रणात, काही जवान किरकोळ जखमी’, भारतीय सैन्याची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 13:40 IST

India-China Conflict: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर भारतीय सैन्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

India-China Conflict: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये असलेल्या 'वास्तविक नियंत्रण रेषेवर' (LAC) चीनसोबत नुकत्याच झालेल्या चकमकीवर पहिल्यांदाच भारतीय लष्कराचे वक्तव्य समोर आले आहे. ईस्टर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ राणा प्रताप कलिता म्हणाले की, आपल्या भारतीय सैन्याने तवांग सेक्टरमध्ये चिनी सैन्याचा अतिशय जोरदार मुकाबला केला. यात काही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे.

राणा प्रताप कलिता पुढे म्हणाले की, कोणत्याही खोट्या बातम्यांच्या आहारी जाऊ नका, आमचे सीमेवर पूर्ण नियंत्रण आहे. बुमला येथे ध्वज बैठक घेऊन हे प्रकरण सोडवले गेले आहे. दोन्ही देशांचे सैन्य माघारी परतले असून, परिस्थिती आमच्या नियंत्रणात आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

सीमेवर हवाई दलाचा सरावपूर्व लडाखमध्ये सुरू झालेल्या वादानंतर लष्कर आणि हवाई दलाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम प्रदेशातील LAC वर दोन वर्षांहून अधिक काळापासून तयारी सुरू केली आहे. चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाने गुरुवारी ईशान्य भागात मोठा सराव सुरू केला आहे. या सरावात राफेल लढाऊ विमानांचाही समावेश आहे. 

तवांगमध्ये काय घडलं?9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील वास्तविक नियंत्रण रेषेचे (LAC) विवादित ठिकाण तवांग सेक्टरच्या यांगत्सेमध्ये भारतीय आणि चिनी गस्त घालत होते. यादरम्यान दोन्ही देशांचे सैन्य पुढे आले. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. काही मिनिटांतच हाणामारी वाढली. दोन्ही सैन्याने अतिरिक्त लष्करी मदतीची मागणी केली. सुमारे 250 सैनिक चीनच्या बाजूने आले होते आणि सुमारे 200 सैनिक भारताकडून आले होते. हाणामारी वाढली तेव्हा दोन्ही बाजूंचे वरिष्ठ अधिकारी रिंगणात उतरले आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवान