शहरं
Join us  
Trending Stories
1
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
2
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
3
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
4
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
5
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
6
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
7
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
8
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
9
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
10
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
11
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
12
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
13
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
14
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
15
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
16
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
17
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
18
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
19
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
20
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास

Rajnath Singh, India-China Clash in Tawang: चिनी अतिक्रमणाचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला, एकाचाही मृत्यू नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 13:31 IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी लोकसभेत दिलं उत्तर

Rajnath Singh, India China Border Clash LIVE Updates at Tawang: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी अरुणाचल प्रदेशात भारतीय आणि चिनी सैनिकांमधील चकमकीसंदर्भात लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली. राजनाथ सिंह म्हणाले की, आपल्या एकाही सैनिकाचा मृत्यू झालेला नाही किंवा कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. संसदेत या संदर्भातील माहिती देण्यापूर्वी राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी या मुद्द्यावर बैठक बोलावली होती. या उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, सीडीएस लेफ्टनंट जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सेवेचे प्रमुख एनएसए अजित डोवाल आणि इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तवांग येथील भारत-चीन संघर्षावर वरिष्ठ मंत्र्यांसोबत संसदेत त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली.

सीमेवरील थराराबद्दल राजनाथ सिंह काय म्हणाले?

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुपारी १२ वाजता लोकसभेत लेखी निवेदन वाचून दाखवले. "९ डिसेंबरला PLAच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात अतिक्रमण केले आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि खंबीरपणे परिस्थितीला तोंड दिले. आपल्या सैनिकांनी धैर्याने PLAला भारताच्या प्रदेशात अतिक्रमण करण्यापासून रोखले आणि त्यांना त्यांच्या पोस्टवर माघार घेण्यास भाग पाडले," अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी सीमेवरील थराराची माहिती दिली.

भारत-चीन चकमकीत दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले!

"या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चीनशी चर्चा सुरू आहे. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की आमचे सैन्य आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आव्हान देण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यास तयार आहे. सीमेवर झालेल्या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले आहेत. मी या सदनाला सांगू इच्छितो की आमचा एकही सैनिक शहीद झालेला नाही किंवा कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे PLAच्या सैन्याने त्यांच्या स्थानांवरूनच माघार घेतली," असे राजनाथ सिंह म्हणाले.

तवांगमधील चकमकीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या घटनेनंतर तेथील स्थानिक कमांडरने ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रस्थापित व्यवस्थेअंतर्गत चीनच्या स्थानिक कमांडरसोबत ध्वज बैठक घेतली आणि घटनेवर चर्चा केली आहे.

"चीनी बाजूने अशी कारवाई करू नये असे सांगण्यात आले आणि सीमेवर शांतता राखण्यास सांगितले आहे. मुत्सद्दी पातळीवरही हा मुद्दा चिनी बाजूने मांडण्यात आला आहे. मी सभागृहाला आश्वासन देऊ इच्छितो की आपले सैन्य प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनRajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवान