शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 21:26 IST

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. तसेच, दोन्ही देशांनी सीमावर्ती भागांत शांतता आणि स्थिरता राखण्यावर जोर दिला...

भारत आणि चीन यांच्यातील कोर कमांडर स्तरावरील २३ वी महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी पार पडली. दोन्ही देशांतील सीमा वादाचे काही राहिलेले मुद्दे सोडवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. तसेच, दोन्ही देशांनी सीमावर्ती भागांत शांतता आणि स्थिरता राखण्यावर जोर दिला.

या बैठकीत पूर्व लडाखसह वाद असलेल्या काही भागांच्या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, दोन्ही देशांनी परस्पर विश्वास वाढवण्यावर आणि सीमा व्यवस्थापन मजबूत करण्यावर सहमती दर्शवली आहे. या बैठकीमुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले असल्याचे मानले जात आहे. महत्वाचे म्हणजे, २०२० नंतर याच आठवड्यात भारत आणि चीनदरम्यानची थेट विमानसेवाही पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

तणाव कमी करण्यात यश -२०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत-चीन संबंध कमालीचे ताणले गेले होते. मात्र, गेल्या एका वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या दोन भेटींमुळे तणाव कमी होण्यास मदत झाली. याच बरोबर, सीमा विवादाच्या कायमस्वरूपी समाधानासाठी विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चाही पुन्हा सुरू झाली आहे.

दरम्यान, चीनने भारतीय यात्रेकरूंना मानसरोवर यात्रेची परवानगी दिली आहे, तर भारतानेही चिनी नागरिकांना व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वास्तविक नियंत्रण रेषे (LAC) जवळील काही भागांमध्ये सैन्य तैनातीसंदर्भात अजूनही काही मतभेद आहेत. लष्करी कमांडर स्तरावरील ही बैठक जवळपास एक वर्षानंतर पार पडली आहे. 

दोन्ही देशांचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा हीत, यांचा विचार करूनच सीमा वादावर तोडगा काढला जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंगchinaचीनIndiaभारत