शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 21:26 IST

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. तसेच, दोन्ही देशांनी सीमावर्ती भागांत शांतता आणि स्थिरता राखण्यावर जोर दिला...

भारत आणि चीन यांच्यातील कोर कमांडर स्तरावरील २३ वी महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी पार पडली. दोन्ही देशांतील सीमा वादाचे काही राहिलेले मुद्दे सोडवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. तसेच, दोन्ही देशांनी सीमावर्ती भागांत शांतता आणि स्थिरता राखण्यावर जोर दिला.

या बैठकीत पूर्व लडाखसह वाद असलेल्या काही भागांच्या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, दोन्ही देशांनी परस्पर विश्वास वाढवण्यावर आणि सीमा व्यवस्थापन मजबूत करण्यावर सहमती दर्शवली आहे. या बैठकीमुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले असल्याचे मानले जात आहे. महत्वाचे म्हणजे, २०२० नंतर याच आठवड्यात भारत आणि चीनदरम्यानची थेट विमानसेवाही पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

तणाव कमी करण्यात यश -२०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत-चीन संबंध कमालीचे ताणले गेले होते. मात्र, गेल्या एका वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या दोन भेटींमुळे तणाव कमी होण्यास मदत झाली. याच बरोबर, सीमा विवादाच्या कायमस्वरूपी समाधानासाठी विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चाही पुन्हा सुरू झाली आहे.

दरम्यान, चीनने भारतीय यात्रेकरूंना मानसरोवर यात्रेची परवानगी दिली आहे, तर भारतानेही चिनी नागरिकांना व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वास्तविक नियंत्रण रेषे (LAC) जवळील काही भागांमध्ये सैन्य तैनातीसंदर्भात अजूनही काही मतभेद आहेत. लष्करी कमांडर स्तरावरील ही बैठक जवळपास एक वर्षानंतर पार पडली आहे. 

दोन्ही देशांचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा हीत, यांचा विचार करूनच सीमा वादावर तोडगा काढला जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंगchinaचीनIndiaभारत