शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

LAC ओलांडून भटकत सीमेच्या आत आले 13 याक, भारतीय सैन्यांनी चीनच्या केले स्वाधीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 14:14 IST

भारतीय जवांनानी पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं. त्या याकना भारतीय जवानांनी चीनच्या हवाली केले.

सोमवारी भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडने एक अत्यंत कौतुकास्पद गोष्टीची माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) दुसर्‍या बाजूला म्हणजेच चिनी बाजूने भटकत असलेली काही याक आणि त्यांच्या बछड्यांनी भारतीय सीमेच्या हद्दीत प्रवेश केला, त्यानंतर भारतीय जवांनानी पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं. त्या याकना भारतीय जवानांनी चीनच्या हवाली केले. ईस्टर्न कमांडने सांगितले की, चिनी अधिका-यांनी 'संवेदनशील वृत्ती' दाखविल्याबद्दल भारतीय सैन्याचे आभार मानले.ईस्टर्न कमांडच्या एका ट्विटमध्ये असे सांगितले गेले होते की, 'मानवतावादाच्या जोरावर भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामंगच्या LACच्या पलीकडे सीमेवरून आलेल्या 13 याक आणि चार वासरे 7 सप्टेंबर रोजी चीनच्या ताब्यात दिली. यावेळी उपस्थित चिनी अधिका-यांनी भारतीय सैन्याच्या दयाळूपणाबद्दल आभार मानले.भारत आणि चीन यांच्यामध्ये लडाखच्या सीमेवर LACवरून तणाव आहे. सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे शुक्रवारी लडाख येथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले. ते म्हणाले की, दोन्ही देश लष्करी व मुत्सद्दी चर्चेद्वारे हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.अलीकडे भारताने पँगॉग तलावाच्या दक्षिणेकडील किना-यावर आक्रमक चिनी सैन्याच्या कारवाया रोखल्या.  चिनी सैन्याने चुशूलजवळील पँगॉग त्सो येथील पॅंगॉग तलावाच्या दक्षिण किना-याजवळील भारतीय भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय सैन्याने वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला.चीनमधील घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे एप्रिल-मेपासून भारत आणि चीनला LACवर तणाव येत आहे. फिंगर एरिया, गलवान व्हॅली, हॉट स्प्रिंग्ज आणि कोंगरुआंग नाला भागात चीनशी तणाव आहे. परिस्थिती अधिक गंभीर बनली जेव्हा जून महिन्यात, गलवान खो-यात दोन देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित चकमक झाली आणि 20 भारतीय जवानांना यात वीरमरण आले. 40हून अधिक चिनी सैनिकही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे, परंतु याबाबत कोणतीही खात्री पटलेली नाही.