शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

भारत मागे राहू शकत नाही! - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 03:17 IST

डिजिटल चलन युगात भारत मागे राहू शकत नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे व्यक्त केले. सरकारच्या डिजिटल व्यवहारांच्या धोरणांवर टीका करणाºया ‘दिग्गजां’चाही त्यांनी समाचार घेतला.

उजिरे (कर्नाटक) : डिजिटल चलन युगात भारत मागे राहू शकत नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे व्यक्त केले. सरकारच्या डिजिटल व्यवहारांच्या धोरणांवर टीका करणाºया ‘दिग्गजां’चाही त्यांनी समाचार घेतला.मंगळुरुजवळ ५० किमी अंतरावर असलेल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात येथे रॅलीत बोलताना मोदी म्हणाले की, डिजिटल चलनाचे युग आता सुरु झाले आहे. यात भारत मागे राहू शकत नाही. नगदीच्या वापरामुळे सामाजिक दोष वाढत जातील. पंतप्रधान मोदी म्हणाले की, गत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत काही दिग्गजांनी संसदेत भाषण केले. हे दिग्गज स्वत:ला तीस मार खा समजतात. जे स्वत:ला ज्ञानाचे केंद्र मानतात. ते म्हणत होते की, भारतात गरीबी आहे. शिक्षणाचा अभाव आहे. अशात डिजिटल व्यवहार काम करु शकत नाहीत. या लोकांनी आश्चर्य व्यक्त केले की, लोक कसे काय नगदीशिवाय व्यवहार करु शकतात.यावेळी मोदी यांनी रॅलीत प्रतिकात्मक स्वरुपात एका लाभार्थ्याला रुपे कार्ड भेट दिले. जनधन योजनेंतर्गत १२ लाख खातेधारक रुपे कार्डधारक होतील. मोदी म्हणाले की, काळ बदलत आहे आणि त्यासोबत चलनही बदलत आहे. एकेकाळी दगड असलेले व नंतर लेदर, सोने, चांदी, कागद आणि प्लास्टिक असे हे स्थित्यंतर आहे. आता डिजिटल चलनाचे युग सुरु झाले आहे. यात भारताने मागे राहू नये. जगातील विकसित देश कौशल्य विकासावर चर्चा करत आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, भारतात ३५ वर्षांच्या आतील ८० कोटी म्हणजेच लोकसंख्येच्या ६५ टक्के लोक आहेत. या लोकांवर आपल्याला गर्व आहे.दिल्लीहून १ रुपया, गावात पोहोचतात १५ पैसेमोदी म्हणाले की, आमच्या एका माजी पंतप्रधानांनी असे म्हटले होते की, जर १ रुपया दिल्लीतून जात असेल तर, गावात पोहचेपर्यंत १५ पैसे राहतात. थेट हस्तांतरण योजनेचा उल्लेख करुन ते म्हणाले की, ५७,००० कोटी रुपये अवैध स्वरुपात कुणाच्या हातात जात होते. सरकारच्या प्रयत्नांनी हे प्रकार थांबले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा