शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

जुमल्यावर देश चालविता येत नाही : सिसोदिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:43 AM

देश जुमल्यावर चालत नाही आणि लोकांनाही आता या गोष्टी कळालेल्या आहेत, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.

पणजी : मागची लोकसभा निवडणूक ही जुमल्यावर लढवली गेली; परंतु देश जुमल्यावर चालत नाही आणि लोकांनाही आता या गोष्टी कळालेल्या आहेत, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले. मडगाव (गोवा) येथे शैक्षणिक परिसंवादामध्ये सहभागासाठी ते आले आहेत. सोमवारी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गांधीजींचा चष्म्याचे प्रतीक वापरून देश स्वच्छ होत असतो, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.पंतप्रधान मोदी विकासाचे बोलतात; परंतु वास्तव वेगळेच आहे, असे त्यांनी सांगितले. साधे स्वच्छतेचे उदाहरण घ्या, देशात तुम्ही कोठेही जा, वास्तव वेगळे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जीएसटी ही अत्यंत चांगली संकल्पना; मात्र त्याची अंमलबजावणी अत्यंत वाईट पद्धतीने केली गेली, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. एका वर्षात जीएसटीच्या नियमांत पन्नास दुरुस्त्या केल्या गेल्या. खरे तर देशासाठी व्यवहार्य जीएसटी गरजेची आहे, असे ते म्हणाले. सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागू करू नये, असे मी जीएसटीसंदर्भातील बैठकीत सांगितले होते. प्रत्यक्षात एक वर्षाने सॅनिटरी नॅपकिन्सना जीएसटीतून वगळले गेले. जीएसटीमुळे व्यापाराची प्रक्रिया सुलभ होण्याची अपेक्षा होती; प्रत्यक्षात उद्योग जगत घाबरून आहे. डिजिटलायझेशन वगैरे मोदी बोलतात; पण देशभरातील वास्तव वेगळेच आहे, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAAPआपBJPभाजपा