शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

'एक हजार महात्मा गांधी आणि एक लाख नरेंद्र मोदी मिळूनही भारत स्वच्छ करु शकत नाहीत'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 15:19 IST

स्वच्छता मोहिमेला तीन वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाने सहभाग घेतल्याशिवाय स्वच्छता मोहिम कधीच पुर्ण होऊ शकत नाही असं म्हटलं आहे

नवी दिल्ली - स्वच्छता मोहिमेला तीन वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाने सहभाग घेतल्याशिवाय स्वच्छता मोहिम कधीच पुर्ण होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, 'एक हजार महात्मा गांधी आणि एक लाख नरेंद्र मोदी जरी आले तरी हे स्वप्न पुर्ण होऊ शकत नाही'. 'स्वच्छता मोहीम फक्त सरकार किंवा महात्मा गांधींचं आंदोलन राहिलेलं नाही, देशातील सामान्य नागरिकांनी हे आंदोलन आपल्या खांद्यावर घेतलं आहे', असं नरेंद्र मोदी बोलले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशवासियांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करत सांगितलं की, 'जर एक हजार महात्मा गांधी आले, एक लाख नरेंद्र मोदी आले, सर्व मुख्यमंत्री एकत्र आले, सर्व सरकारांनी एकत्र प्रयत्न केला तरी स्वच्छतेचं स्वप्न पुर्ण होऊ शकत नाही. पण जर 125 कोटी देशवासी एकत्र आले, तर पाहता पाहता हे स्वप्न पुर्ण होऊन जाईल'. आपण हे बोलल्यानंतर आपली धुलाई होऊ शकते असं मिश्किलपणे सांगत देशवासियांसमोर तथ्य ठेवणं गरजेचं आहे असं नरेंद्र मोदी बोलले. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवरही टीका केली. 'मोदीला शिव्या देण्यासाठी खूप विषय आहेत. मात्र समाजाला जागरुक करण्यासाठी होणा-या कार्यक्रमांमध्ये राजकारण आणता कामा नये. समाजात परिवर्तन घडवणा-या विषयांची खिल्ली उडवली जाऊ नये', असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

महात्मा गांधींचा मार्ग चुकीचा असू शकत नाही टीका होत असतानाही सरकार स्वच्छता मोहिमेला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. ते बोललेत की, 'तीन वर्ष आम्ही हे काम करत आहोत, कारण बापूंनी जो रस्ता सांगितला तो चुकीचा असू शकत नाही. आव्हानं आहेत, पण आव्हानं आहेत म्हणून देशाला ज्या परिस्थितीत आहे तसंच ठेवलं जाऊ शकत नाही. ज्या गोष्टी केल्यानंतर आपली स्तुती होईल, उदोउदो होईल अशाच गोष्टींना आपण हात लावायचा का ?'.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधी