शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 22:45 IST

सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतरही मालदीवमधील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. पराभूत झाल्यानंतरही राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी अद्याप येथील सत्ता सोडली नसल्याने राजकीय पेच वाढला आहे.

नवी दिल्ली - सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतरही मालदीवमधील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. पराभूत झाल्यानंतरही राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी अद्याप येथील सत्ता सोडली नसल्याने राजकीय पेच वाढला असून, यामीन यांनी सत्ता न सोडल्यास लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारताकडून हस्तक्षेप होण्याचीही शक्यता आहे. तसेच   निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही यामिन यांनी सत्ता न सोडल्यास त्यांना कठोर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिका आणि युरोपियन देशांनी दिला आहे.  मालदीवमधील परिस्थितीवर भारताची नजर असून, गरज पडल्यास योग्य पावले उचलण्यात येतील, असे भारताने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक निर्बंधांसोबतच अन्य पर्यायांसदर्भात आंतरराष्ट्रीय समुदाय विचार करत आहे. यामध्ये भारताचाही सक्रीय सहभाग असणार आहे. मालदीवमध्ये झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार इब्राहीम मोहम्मद सोहील यांनी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना पराभूत केले होते. मात्रा यामीन यांना अद्याप सत्ता सोडलेली नाही. तसेच त्यांनी निवडणुकीतील निकालालाही न्यायालयात आव्हान दिले आहे. 

दरम्यान, मालदीवमधील राष्ट्रपती निवडणुकीतील निकाल हा चीनसाठी धक्कादायक होता. सत्ताधारी असलेल्या अब्दुल्ला यामीन यांचा पराभव होऊ शकत नाही, अशीच अटकळ बांधली जात होती. परंतु विरोधी पक्षाचे उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला. मालदीवमध्ये अब्दुल्ला यामीन यांच्या पराभवानं एक प्रकारे चीनलाही धक्का बसला आहे. विशेष म्हणजे यातून भारताला नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. यामीन हे चीनच्या फारच जवळ होते आणि ते गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत फटकून वागत होते. परंतु आता सोलिह यांच्या विजयानं भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारत