शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Corona Update India: कोरोनावर भारताचा मोठा विजय! ३२ महिन्यांनी पहिल्यांदा एकही मृत्यू नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 21:13 IST

देशात कोरोना महामारीचा वेग मंदावला आहे. आज मंगळवारी, भारतात गेल्या २४ तासांत कोविड-१९ मुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मार्च २०२० नंतर प्रथमच असे घडले आहे.

Corona Update India: कोरोना संबंधी एक अतिशय महत्त्वाची, आनंददायी आणि दिलासादायक गोष्ट आज भारतात घडली आहे. इतर देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत असतील, तरी भारतात मात्र या महामारीचा वेग मंदावला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी गेल्या २४ तासांत देशात ६२५ COVID-19 रुग्ण आढळले. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, ९ एप्रिल २०२० नंतर इतकी कमी प्रकरणे नोंदवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच २०२० नंतर असे भारतात पहिल्यांदाच २४ तासांच्या कालावधीत कोरोनामुळे एकाही मृत्यूची झाली नाही. ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या जरी ४ कोटी ४६ लाख ६२ हजार १४१ वर गेली असली, तर सक्रिय रूग्णसंख्या ही १४ हजार ०२१ इतकी कमी झाली आहे. तर आज एकही कोरोनाबाधिक मृत्यू न झाल्याने मृतांची संख्या ५ लाख ३० हजार ५०९ इतकी कायम आहे.

९ एप्रिल २०२० रोजी एकाच दिवसात एकूण ५४० नवीन प्रकरणे नोंदवली गेली. मार्च २०२० नंतर असे पहिल्यांदाच घडले की गेल्या २४ तासात देशात एकाचाही मृत्यू झालेला नाही. कर्नाटकातील कलबुर्गी येथे ७६ वर्षीय व्यक्ती भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी ठरला होता. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, सध्या एकूण प्रकरणांपैकी ०.०३ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट ९८.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. या आजारातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या ४ कोटी ४१ लाख १७ हजार ६११ झाली आहे, तर मृत्यूदर १.१९ टक्के नोंदवला गेला. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे २१९.७४ कोटी डोस देण्यात आले आहेत.

भारतातील कोविड-19 ची संख्या ७ ऑगस्ट २०२० रोजी २० लाख, २३ ऑगस्ट रोजी ३० लाख, ५ सप्टेंबर ४० लाख आणि १६ सप्टेंबर रोजी ५० लाखांवर गेली होती. २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाखांचा आकडा पार केला होता. २९ ऑक्टोबरला ८० लाख, २० नोव्हेंबरला ९० लाख आणि १९ डिसेंबरला एक कोटींचा टप्पा पार केला. भारतात ४ मे रोजी २ कोटी, गेल्या वर्षी २३ जून रोजी ३ कोटी आणि यावर्षी २५ जानेवारी रोजी ४ कोटी प्रकरणे पार केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या