शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

इतर देशांपेक्षा तातडीने हालचाली केल्याने भारताची स्थिती चांगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 06:06 IST

आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातील निष्कर्ष । केंद्र सरकारच्या उपाययोजनांचे कौतुक

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य आजाराचा फैलाव सुरू झाल्यानंतर भारताने इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया या देशांपेक्षा तातडीने हालचाली करून प्रतिबंधक उपाययोजना केल्या, अशा शब्दांत आॅक्सफर्ड विद्यापीठाने आपल्या देशाचे कौतुक केले आहे. विद्यापीठाने यासंदर्भात केलेल्या एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ही साथ पसरल्यानंतर ती रोखण्यासाठी प्रत्येक देशाने किती तत्परतेने हालचाली केल्या, याचा अभ्यास ‘आॅक्सफर्ड कोव्हिड-१९ गव्हर्न्मेंट रिस्पॉन्स ट्रॅकर’ (ओएक्ससीजीआरटी) यांच्या माध्यमातून करण्यात आला. या अभ्यासासाठी ११ निकष निश्चित करून विद्यापीठाने माहिती गोळा केली. कोरोनाची साथ आल्यानंतर कोणत्या देशाने तातडीने निर्णय घेतले, याचा अभ्यास विद्यापीठाने केला. त्या बाबींमध्ये शाळा व सर्व शिक्षणसंस्था बंद करणे, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणे, सार्वजनिक वाहतूक स्थगित करणे, लोकजागृतीसाठी मोहीम हातीघेणे, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी उपाययोजना करणे, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवा स्थगित करणे, आरोग्यसेवेसाठी अधिक निधी उपलब्ध करणे, लस निर्मितीसाठी केलेले जोरदार प्रयत्न, लसीच्या चाचणीसाठी केलेल्या सोयी, रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवणे आदी गोष्टींचा समावेश आहे.‘ओएक्ससीजीआरटी’ प्रकल्पात सहभागी व ब्लावंटिक स्कूल आॅफ गव्हर्मेंट येथील सहाय्यक प्राध्यापक थॉमस हेल म्हणाले, ‘कोरोना साथ पसरल्यानंतर विविध देशांच्या सरकारांनी किती जलद वा विलंबाने निर्णय घेतले याबद्दल आम्ही केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष धोरणकर्त्यांना मार्गदर्शक ठरतील. अशा साथीच्या वेळेस तातडीने व परिणामकारक ठरतील, अशी कोणती पावले उचलायला हवी, हेही या अभ्यासाच्या निष्कर्षांतून लक्षात येते.’तातडीच्या निर्णयांमुळे उजवी कामगिरीकोरोना साथीचा धोका लक्षात घेऊन भारतात केंद्र सरकारने पहिल्यापासून अतिशय तातडीने निर्णय घेतले. आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा स्थगित केली, २१ दिवसांचा लॉकडाऊन पुकारला, राज्याच्या सीमा बंद केल्या. तसेच, १२ लाख लोकांची आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झाली की नाही, हे तपासण्यासाठीचाचणी करण्यात आली आहे. अन्य कोरोनाग्रस्त देशांच्या तुलनेत भारताची ही कामगिरी उजवी असल्याचे निष्कर्षात म्हटले आहे.

टॅग्स :Indiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी