शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

इतर देशांपेक्षा तातडीने हालचाली केल्याने भारताची स्थिती चांगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 06:06 IST

आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातील निष्कर्ष । केंद्र सरकारच्या उपाययोजनांचे कौतुक

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य आजाराचा फैलाव सुरू झाल्यानंतर भारताने इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया या देशांपेक्षा तातडीने हालचाली करून प्रतिबंधक उपाययोजना केल्या, अशा शब्दांत आॅक्सफर्ड विद्यापीठाने आपल्या देशाचे कौतुक केले आहे. विद्यापीठाने यासंदर्भात केलेल्या एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ही साथ पसरल्यानंतर ती रोखण्यासाठी प्रत्येक देशाने किती तत्परतेने हालचाली केल्या, याचा अभ्यास ‘आॅक्सफर्ड कोव्हिड-१९ गव्हर्न्मेंट रिस्पॉन्स ट्रॅकर’ (ओएक्ससीजीआरटी) यांच्या माध्यमातून करण्यात आला. या अभ्यासासाठी ११ निकष निश्चित करून विद्यापीठाने माहिती गोळा केली. कोरोनाची साथ आल्यानंतर कोणत्या देशाने तातडीने निर्णय घेतले, याचा अभ्यास विद्यापीठाने केला. त्या बाबींमध्ये शाळा व सर्व शिक्षणसंस्था बंद करणे, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणे, सार्वजनिक वाहतूक स्थगित करणे, लोकजागृतीसाठी मोहीम हातीघेणे, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी उपाययोजना करणे, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवा स्थगित करणे, आरोग्यसेवेसाठी अधिक निधी उपलब्ध करणे, लस निर्मितीसाठी केलेले जोरदार प्रयत्न, लसीच्या चाचणीसाठी केलेल्या सोयी, रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवणे आदी गोष्टींचा समावेश आहे.‘ओएक्ससीजीआरटी’ प्रकल्पात सहभागी व ब्लावंटिक स्कूल आॅफ गव्हर्मेंट येथील सहाय्यक प्राध्यापक थॉमस हेल म्हणाले, ‘कोरोना साथ पसरल्यानंतर विविध देशांच्या सरकारांनी किती जलद वा विलंबाने निर्णय घेतले याबद्दल आम्ही केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष धोरणकर्त्यांना मार्गदर्शक ठरतील. अशा साथीच्या वेळेस तातडीने व परिणामकारक ठरतील, अशी कोणती पावले उचलायला हवी, हेही या अभ्यासाच्या निष्कर्षांतून लक्षात येते.’तातडीच्या निर्णयांमुळे उजवी कामगिरीकोरोना साथीचा धोका लक्षात घेऊन भारतात केंद्र सरकारने पहिल्यापासून अतिशय तातडीने निर्णय घेतले. आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा स्थगित केली, २१ दिवसांचा लॉकडाऊन पुकारला, राज्याच्या सीमा बंद केल्या. तसेच, १२ लाख लोकांची आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झाली की नाही, हे तपासण्यासाठीचाचणी करण्यात आली आहे. अन्य कोरोनाग्रस्त देशांच्या तुलनेत भारताची ही कामगिरी उजवी असल्याचे निष्कर्षात म्हटले आहे.

टॅग्स :Indiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी