शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

इतर देशांपेक्षा तातडीने हालचाली केल्याने भारताची स्थिती चांगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 06:06 IST

आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातील निष्कर्ष । केंद्र सरकारच्या उपाययोजनांचे कौतुक

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य आजाराचा फैलाव सुरू झाल्यानंतर भारताने इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया या देशांपेक्षा तातडीने हालचाली करून प्रतिबंधक उपाययोजना केल्या, अशा शब्दांत आॅक्सफर्ड विद्यापीठाने आपल्या देशाचे कौतुक केले आहे. विद्यापीठाने यासंदर्भात केलेल्या एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ही साथ पसरल्यानंतर ती रोखण्यासाठी प्रत्येक देशाने किती तत्परतेने हालचाली केल्या, याचा अभ्यास ‘आॅक्सफर्ड कोव्हिड-१९ गव्हर्न्मेंट रिस्पॉन्स ट्रॅकर’ (ओएक्ससीजीआरटी) यांच्या माध्यमातून करण्यात आला. या अभ्यासासाठी ११ निकष निश्चित करून विद्यापीठाने माहिती गोळा केली. कोरोनाची साथ आल्यानंतर कोणत्या देशाने तातडीने निर्णय घेतले, याचा अभ्यास विद्यापीठाने केला. त्या बाबींमध्ये शाळा व सर्व शिक्षणसंस्था बंद करणे, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणे, सार्वजनिक वाहतूक स्थगित करणे, लोकजागृतीसाठी मोहीम हातीघेणे, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी उपाययोजना करणे, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवा स्थगित करणे, आरोग्यसेवेसाठी अधिक निधी उपलब्ध करणे, लस निर्मितीसाठी केलेले जोरदार प्रयत्न, लसीच्या चाचणीसाठी केलेल्या सोयी, रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवणे आदी गोष्टींचा समावेश आहे.‘ओएक्ससीजीआरटी’ प्रकल्पात सहभागी व ब्लावंटिक स्कूल आॅफ गव्हर्मेंट येथील सहाय्यक प्राध्यापक थॉमस हेल म्हणाले, ‘कोरोना साथ पसरल्यानंतर विविध देशांच्या सरकारांनी किती जलद वा विलंबाने निर्णय घेतले याबद्दल आम्ही केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष धोरणकर्त्यांना मार्गदर्शक ठरतील. अशा साथीच्या वेळेस तातडीने व परिणामकारक ठरतील, अशी कोणती पावले उचलायला हवी, हेही या अभ्यासाच्या निष्कर्षांतून लक्षात येते.’तातडीच्या निर्णयांमुळे उजवी कामगिरीकोरोना साथीचा धोका लक्षात घेऊन भारतात केंद्र सरकारने पहिल्यापासून अतिशय तातडीने निर्णय घेतले. आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा स्थगित केली, २१ दिवसांचा लॉकडाऊन पुकारला, राज्याच्या सीमा बंद केल्या. तसेच, १२ लाख लोकांची आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झाली की नाही, हे तपासण्यासाठीचाचणी करण्यात आली आहे. अन्य कोरोनाग्रस्त देशांच्या तुलनेत भारताची ही कामगिरी उजवी असल्याचे निष्कर्षात म्हटले आहे.

टॅग्स :Indiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी