शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदी सरकारचा चीनवर 'थंडगार' स्ट्राईक; 'या' वस्तूची आयात रोखण्याचा निर्णय

By कुणाल गवाणकर | Updated: October 16, 2020 09:14 IST

india bans import of air conditioners with refrigerants: आत्मनिर्भर भारतला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारचं पाऊल

नवी दिल्ली: मोदी सरकारनं रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरच्या आयातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अंतर्गत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून एसींची आयात रोखण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरची आयात रोखण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यापार संचलनालयानं एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून दिली. रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरच्या आयातीचं धोरण 'मुक्त'वरून 'प्रतिबंधित' करण्यात आल्याची माहिती संचलनालयानं दिली आहे. व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं अत्यावश्यक नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात धोरणाचा आढावा घेतला. त्यानंतर एसीची आयात रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.विविध क्षेत्रांमध्ये पूर्णपणे स्वावलंबी होण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत अभियानावर भाष्य करताना जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एसीच्या आयातीचा विशेष उल्लेख केला. 'एसी उत्पादनात स्वावलंबी होण्याची गरज आहे. आपण आपल्या एकूण मागणीच्या ३० टक्क्यांहून एसी आयात करतो. आपल्याला हे प्रमाण वेगानं कमी करायला हवं,' असं मोदी म्हणाले होते.अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्याचे प्रयत्न सरकारकडून सातत्यानं सुरू आहेत. जूनमध्ये सरकारनं कार, बस, ट्रक आणि दुचाकींमध्ये वापरले जाणारे न्यूमॅटिक टायरची आयात रोखण्याचा निर्णय घेतला. याआधी सरकारनं टीव्हीपासून संरक्षण सामग्रीपर्यंतची आयात थांबवण्याचे निर्णय घेतले आहेत.चीनला मोठा धक्काभारत एसींची सर्वाधिक आयात चीन आणि थायलंडमधून करतो. भारताच्या एकूण आयातीच्या ९० टक्के आयात या दोन देशांमधून होते. त्यामुळे एसीच्या आयातीवर घातलेली बंदी चीनसाठी धक्का मानला जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन