शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
2
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
7
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
8
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
9
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
10
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
11
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
12
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
13
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
14
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
15
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
16
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
17
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
18
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
19
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
20
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

भारत व पाकिस्तान पुन्हा एक होतील

By admin | Updated: December 27, 2015 02:42 IST

एक दिवस भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन देश पुन्हा एक होतील, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विश्वास आहे. हे तिन्ही देश एक होतील, पण युद्धाच्या माध्यमातून नव्हे,

नवी दिल्ली : एक दिवस भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन देश पुन्हा एक होतील, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विश्वास आहे. हे तिन्ही देश एक होतील, पण युद्धाच्या माध्यमातून नव्हे, तर लोकांच्या सद्भावनेतून (पॉप्युलर गुडविल) ते एक होतील, असे मत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारच्या रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी लाहोरला आकस्मिकपणे भेट दिली, त्याच रात्री माधव यांनी हे विधान केले. ‘लोकांना वाटत असेल तर (पॉप्युलर गुडविल) ६० वर्षांपूर्वी काही ऐतिहासिक कारणांमुळे वेगवेगळे झालेले हे तिन्ही भूभाग पुन्हा एकदा एकत्र येतील आणि पुन्हा अखंड भारत निर्माण होईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अद्यापही वाटत आहे,’ असे राम माधव म्हणाले. ते अल-जझीरा या दोहा येथील टीव्ही वाहिनीशी बोलत होते. ‘आरएसएसचा एक स्वयंसेवक या नात्याने माझेही असेच मत आहे,’ अशी पुष्टी माधव यांनी जोडली. याचा अर्थ आम्ही एखाद्या देशाशी युद्ध केले पाहिजे, त्या देशाला आपल्यात सामील करून घेतले पाहिजे असा नाही. हे तिन्ही देश एक दिवस पुन्हा एक होतील, याचा अर्थ आम्ही त्या देशांसोबत युद्ध करावे असा होत नाही. आपण युद्ध न करता लोकांच्या सहमतीने आणि सद्भावनेतून कोणत्याही देशाला आपल्यासोबत जोडू शकतो. असे घडू शकते, असेही माधव यांनी स्पष्ट केले. रा. स्व. संघाचे प्रचारक असलेले माधव पुढे म्हणाले, ‘भारत ही अशी भूमी आहे, की जेथे विशिष्ट जीवन मार्ग, विशिष्ट संस्कृती किंवा सभ्यतेचे आचरण केले जाते. आम्ही त्याला हिंदू असे संबोधतो. याला तुमची काही हरकत आहे काय? भारताची एकच संस्कृती, आम्ही एक आहोत, आम्ही एक राष्ट्र आहोत. आरएसएस ही संघटना एक विचारधारा असून ती ‘फॅसिस्ट’ नाही.ही भारताच्या सर्वाधिकारासाठी आहे आणि ही संघटना वा आक्रमक नाही.’राम म्हणाले, सरकारला बदनाम करण्यासाठी पुरस्कार वापसीवाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात लेखक व साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहेत. याबाबत विचारले असता माधव म्हणाले, काही मूठभर लोक संपूर्ण देशाच्या मताचे प्रतिनिधित्व करीत नसतात आणि पुरस्कार परत न करणाऱ्या व या पुरस्कार वापसीला पाठिंबा न देणाऱ्या साहित्यिक व लेखकांची संख्या मोठी आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी ही पुरस्कार वापसी आहे. एकप्रकारे हे लोक आपल्या चुकीच्या विरोध प्रदर्शनाने भारताला बदनाम करीत आहेत. राम उवाच:माधव यांचे हे वक्तव्य असलेला कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या लाहोर भेटीच्या पूर्वीच लंडनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता; पण हा कार्यक्रम शुक्रवारी रात्री उशिरा दाखविण्यात आला.