शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

भारत आणि चीनमध्ये होणार युद्ध, अमेरिका देणार भारताला साथ - मेघनाद देसाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 22:19 IST

भारताबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्फोटक मिश्रण तयार झाले आहे. त्यामुळे डोकलाम येथे निर्माण झालेल्या तणावाचे भविष्य आता दक्षिण चिनी समुद्रातील हालचालींवर अवलंबून आहे. त्यामुळे या दोन्ही भागात युद्ध भडकू शकते

नवी दिल्ली, दि. 4 -  डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीनमधील संबंध ताणलेले असतानाच आशिया खंडातील या दोन मोठ्या देशांमध्ये युद्ध होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ मेघनाद देसाई यांनी व्यक्त केली आहे. भारताबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्फोटक मिश्रण तयार झाले आहे. त्यामुळे डोकलाम येथे निर्माण झालेल्या तणावाचे भविष्य आता दक्षिण चिनी समुद्रातील हालचालींवर अवलंबून आहे. त्यामुळे या दोन्ही भागात युद्ध भडकू शकते आणि असे झाल्यास भारत आणि अमेरिका एका बाजूला तर चीन एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण होईल, असे देसाई यांनी म्हटले आहे. ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये मजूर पक्षाचे सदस्थ असलेल्या देसाई यांनी सांगितले की, "डोकलाम येथील तणाव हा केवळ भारत आणि चीनमधील प्रश्न नाही. तर तो जगभरातील तणाव आणि दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त मुद्यांशी संबंधित आहे." देसाई यांनी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतील देसाई म्हणाले, "डोकलामचा प्रश्न निकाली निघतोय असे आजही कुणी मान्य करणार नाही. पुढच्या एका महिन्याच्या आत आपल्यावर चीनसोबत एक संपूर्ण युद्धाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्या स्थितीत हो युद्ध रोखता येणार नाही. ही बाब आश्चर्यजनक असू शकते. पण अशा परिस्थितीत भारताचा अन्य देशांशी असलेले संरक्षण विषयक संबंध फायदेशीर ठरू शकतात."मात्र भारत आणि चीनमध्ये खरोखरच युद्ध होण्याची शक्यता आहे का, याबाबत देसाई म्हणतात, "मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे मी दिवस आणि तारीख सांगू शकत नाही. पण सध्याच्या स्थितीचा विचार करता चीनसोबत संपूर्ण युद्ध लढण्याची वेळ आमच्यावर लवकरच येऊ शकते. तसेच हे युद्ध केवळ डोकलामच नाही तर अनेक आघाड्यांवर लढले जाईल. कदाचित संपूर्ण हिमालयामध्येही युद्धाचा आगडोंब उसळू शकतो." "भारत आणि अमेरिकेमध्ये विश्वासपूर्ण संबंध आहेत. तसेच दोन्ही देश सहजपणे एकमेकांवर विश्वास ठेऊ शकतात. त्यामुळे भारत आणि चिनमध्ये युद्ध सुरू झाल्यास अमेरिका निश्चितपणे भारताच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी उभी राहील. भारत अमेरिकेच्या मदतीशिवाय चीनसोबत लढू शकत नाही आणि अमेरिका भारताच्या मदतीशिवाय चीनचा मुकाबला करू शकत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे." असे देसाई पुढे म्हणाले.  "मात्र दोन्ही देशात युद्ध व्हायचे असल्याच दक्षिण चीन समुद्रातील घटनांवर सारे काही अवलंबून असेल. त्यासंदर्भात अमेरिकेने स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे जर युद्ध झाले. तर ते चीन आणि अमेरिकेमध्ये होईल, ज्यात भारत अमेरिकेच्यासोबत असेल," असेही त्यांनी शेवटी सांगितले.