शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

भारत आणि चीनमध्ये होणार युद्ध, अमेरिका देणार भारताला साथ - मेघनाद देसाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 22:19 IST

भारताबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्फोटक मिश्रण तयार झाले आहे. त्यामुळे डोकलाम येथे निर्माण झालेल्या तणावाचे भविष्य आता दक्षिण चिनी समुद्रातील हालचालींवर अवलंबून आहे. त्यामुळे या दोन्ही भागात युद्ध भडकू शकते

नवी दिल्ली, दि. 4 -  डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीनमधील संबंध ताणलेले असतानाच आशिया खंडातील या दोन मोठ्या देशांमध्ये युद्ध होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ मेघनाद देसाई यांनी व्यक्त केली आहे. भारताबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्फोटक मिश्रण तयार झाले आहे. त्यामुळे डोकलाम येथे निर्माण झालेल्या तणावाचे भविष्य आता दक्षिण चिनी समुद्रातील हालचालींवर अवलंबून आहे. त्यामुळे या दोन्ही भागात युद्ध भडकू शकते आणि असे झाल्यास भारत आणि अमेरिका एका बाजूला तर चीन एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण होईल, असे देसाई यांनी म्हटले आहे. ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये मजूर पक्षाचे सदस्थ असलेल्या देसाई यांनी सांगितले की, "डोकलाम येथील तणाव हा केवळ भारत आणि चीनमधील प्रश्न नाही. तर तो जगभरातील तणाव आणि दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त मुद्यांशी संबंधित आहे." देसाई यांनी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतील देसाई म्हणाले, "डोकलामचा प्रश्न निकाली निघतोय असे आजही कुणी मान्य करणार नाही. पुढच्या एका महिन्याच्या आत आपल्यावर चीनसोबत एक संपूर्ण युद्धाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्या स्थितीत हो युद्ध रोखता येणार नाही. ही बाब आश्चर्यजनक असू शकते. पण अशा परिस्थितीत भारताचा अन्य देशांशी असलेले संरक्षण विषयक संबंध फायदेशीर ठरू शकतात."मात्र भारत आणि चीनमध्ये खरोखरच युद्ध होण्याची शक्यता आहे का, याबाबत देसाई म्हणतात, "मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे मी दिवस आणि तारीख सांगू शकत नाही. पण सध्याच्या स्थितीचा विचार करता चीनसोबत संपूर्ण युद्ध लढण्याची वेळ आमच्यावर लवकरच येऊ शकते. तसेच हे युद्ध केवळ डोकलामच नाही तर अनेक आघाड्यांवर लढले जाईल. कदाचित संपूर्ण हिमालयामध्येही युद्धाचा आगडोंब उसळू शकतो." "भारत आणि अमेरिकेमध्ये विश्वासपूर्ण संबंध आहेत. तसेच दोन्ही देश सहजपणे एकमेकांवर विश्वास ठेऊ शकतात. त्यामुळे भारत आणि चिनमध्ये युद्ध सुरू झाल्यास अमेरिका निश्चितपणे भारताच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी उभी राहील. भारत अमेरिकेच्या मदतीशिवाय चीनसोबत लढू शकत नाही आणि अमेरिका भारताच्या मदतीशिवाय चीनचा मुकाबला करू शकत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे." असे देसाई पुढे म्हणाले.  "मात्र दोन्ही देशात युद्ध व्हायचे असल्याच दक्षिण चीन समुद्रातील घटनांवर सारे काही अवलंबून असेल. त्यासंदर्भात अमेरिकेने स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे जर युद्ध झाले. तर ते चीन आणि अमेरिकेमध्ये होईल, ज्यात भारत अमेरिकेच्यासोबत असेल," असेही त्यांनी शेवटी सांगितले.