शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

india china faceoff: सीमा भागातून सैन्य माघारी घेण्यावर भारत व चीन यांचे एकमत; जयशंकर-वांग यी यांच्यात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 07:05 IST

तणाव कोणाच्याच हिताचा नाही

नवी दिल्ली : भारतचीन यांनी आपापले सैन्य मागे घ्यावे, तसेच सीमेवरील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सुमारे पाच मुद्द्यांवर या दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या गुरुवारी मॉस्को येथे झालेल्या बैठकीत एकमत झाले. सीमेवरील तणाव दोन्ही देशांच्या हिताचा नाही, हेही या बैठकीत मान्य करण्यात आले.

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) या संघटनेची मॉस्को येथे बैठक सुरू आहे. त्याला उपस्थित असलेले भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी एक बैठक घेऊन दोन्ही देशांच्या सीमेवरील स्थितीबद्दल चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून बैठकीतील चर्चेची माहिती दिली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव करण्यात आली असून, भारतासाठी तो चिंतेचा विषय आहे. चीनच्या या कृतीने दोन्ही देशांत आजवर झालेल्या करारांचा भंग होत आहे, असा आक्षेप डॉ. एस. जयशंकर यांनी या बैठकीत केल्याचे समजते. सीमेवर सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव का करण्यात आली, याचे कारण चीन देऊ शकलेला नाही. जयशंकर व वांग यी यांच्यातील बैठक सुमारे दोन तास चालली.दोन्ही देशांच्या सीमेवर भविष्यकाळात कोणतीही दुर्दैैवी घटना घडू नये, यासाठी दक्षता बाळगणे, तसेच जिथे संघर्ष सुरू आहे त्या भागातून सैन्याला माघारी जायला सांगणे या गोष्टी चीनने कराव्यात, असे या बैठकीत भारताने बजावले.

मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवा

परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सांगितले की, भारत व चीन ही दोन शेजारी राष्ट्रे असून, त्यांच्यात मतभेद असणे साहजिक आहे. मात्र, ते मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे दोन्ही देशांनी संघर्ष नव्हे, तर परस्परांना सहकार्य करावे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीन