शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

india china faceoff: सीमा भागातून सैन्य माघारी घेण्यावर भारत व चीन यांचे एकमत; जयशंकर-वांग यी यांच्यात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 07:05 IST

तणाव कोणाच्याच हिताचा नाही

नवी दिल्ली : भारतचीन यांनी आपापले सैन्य मागे घ्यावे, तसेच सीमेवरील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सुमारे पाच मुद्द्यांवर या दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या गुरुवारी मॉस्को येथे झालेल्या बैठकीत एकमत झाले. सीमेवरील तणाव दोन्ही देशांच्या हिताचा नाही, हेही या बैठकीत मान्य करण्यात आले.

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) या संघटनेची मॉस्को येथे बैठक सुरू आहे. त्याला उपस्थित असलेले भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी एक बैठक घेऊन दोन्ही देशांच्या सीमेवरील स्थितीबद्दल चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून बैठकीतील चर्चेची माहिती दिली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव करण्यात आली असून, भारतासाठी तो चिंतेचा विषय आहे. चीनच्या या कृतीने दोन्ही देशांत आजवर झालेल्या करारांचा भंग होत आहे, असा आक्षेप डॉ. एस. जयशंकर यांनी या बैठकीत केल्याचे समजते. सीमेवर सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव का करण्यात आली, याचे कारण चीन देऊ शकलेला नाही. जयशंकर व वांग यी यांच्यातील बैठक सुमारे दोन तास चालली.दोन्ही देशांच्या सीमेवर भविष्यकाळात कोणतीही दुर्दैैवी घटना घडू नये, यासाठी दक्षता बाळगणे, तसेच जिथे संघर्ष सुरू आहे त्या भागातून सैन्याला माघारी जायला सांगणे या गोष्टी चीनने कराव्यात, असे या बैठकीत भारताने बजावले.

मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवा

परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सांगितले की, भारत व चीन ही दोन शेजारी राष्ट्रे असून, त्यांच्यात मतभेद असणे साहजिक आहे. मात्र, ते मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे दोन्ही देशांनी संघर्ष नव्हे, तर परस्परांना सहकार्य करावे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीन