शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

india china faceoff: सीमा भागातून सैन्य माघारी घेण्यावर भारत व चीन यांचे एकमत; जयशंकर-वांग यी यांच्यात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 07:05 IST

तणाव कोणाच्याच हिताचा नाही

नवी दिल्ली : भारतचीन यांनी आपापले सैन्य मागे घ्यावे, तसेच सीमेवरील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सुमारे पाच मुद्द्यांवर या दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या गुरुवारी मॉस्को येथे झालेल्या बैठकीत एकमत झाले. सीमेवरील तणाव दोन्ही देशांच्या हिताचा नाही, हेही या बैठकीत मान्य करण्यात आले.

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) या संघटनेची मॉस्को येथे बैठक सुरू आहे. त्याला उपस्थित असलेले भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी एक बैठक घेऊन दोन्ही देशांच्या सीमेवरील स्थितीबद्दल चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून बैठकीतील चर्चेची माहिती दिली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव करण्यात आली असून, भारतासाठी तो चिंतेचा विषय आहे. चीनच्या या कृतीने दोन्ही देशांत आजवर झालेल्या करारांचा भंग होत आहे, असा आक्षेप डॉ. एस. जयशंकर यांनी या बैठकीत केल्याचे समजते. सीमेवर सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव का करण्यात आली, याचे कारण चीन देऊ शकलेला नाही. जयशंकर व वांग यी यांच्यातील बैठक सुमारे दोन तास चालली.दोन्ही देशांच्या सीमेवर भविष्यकाळात कोणतीही दुर्दैैवी घटना घडू नये, यासाठी दक्षता बाळगणे, तसेच जिथे संघर्ष सुरू आहे त्या भागातून सैन्याला माघारी जायला सांगणे या गोष्टी चीनने कराव्यात, असे या बैठकीत भारताने बजावले.

मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवा

परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सांगितले की, भारत व चीन ही दोन शेजारी राष्ट्रे असून, त्यांच्यात मतभेद असणे साहजिक आहे. मात्र, ते मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे दोन्ही देशांनी संघर्ष नव्हे, तर परस्परांना सहकार्य करावे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीन