शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘इंडिया’ आघाडी भाजपला धूळ चारेल; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 06:28 IST

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे.

कोहिमा : अयोध्येतील २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रा. स्व. संघाच्या कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले आहे. हा निवडणूक कार्यक्रम झाला आहे. त्यामुळेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे सांगितले. 

भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.  इंडियाची स्थिती भक्कम आहे. जागावाटपाचा मुद्दाही लवकर सोडवला जाईल. इंडिया आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारेल, असा दावा त्यांनी केला.  

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे. हा संघ आणि भाजपचा कार्यक्रम बनला आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्षांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले, असे ते म्हणाले. 

‘छोट्या राज्याचे’ असला तरीही तुम्ही बरोबरीचेनागालँडचे लोक ‘छोट्या राज्याचे’ असले तरी त्यांनी स्वत:ला देशातील इतर लोकांच्या बरोबरीचे समजले पाहिजे, असे राहुल म्हणाले.लोकांना न्याय देणे तसेच राजकारण, अर्थव्यवस्थेला सर्वांसाठी समान व सुलभ बनविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. तुमचे राज्य लहान असले तरी काही फरक पडत नाही, तुम्ही स्वतःला देशातील इतर लोकांच्या बरोबरीचे समजले पाहिजे, असे ते म्हणाले.

राहुल गांधी एका वेगळ्याच जगात राहतात : भाजपअयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात केलेल्या टिपण्णीवरून भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. ते वेगळ्याच जगात राहतात आणि खोटे बोललो तरी सुटून जाऊ, असे त्यांना वाटते, असा घणाघात केंद्रातील या सत्ताधारी पक्षाने केला. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राजीव चंद्रशेखर म्हणाले की, हिंदूंच्या श्रद्धेवर प्रभाव पाडला जाऊ शकतो, यावर लोकांनी विश्वास ठेवावा, असे राहुल यांना वाटते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा