शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जागावाटपाबाबत ममता बॅनर्जींनी भूमिका स्पष्ट, काँग्रेस समितीला भेटणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 23:52 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच बंगालमधील जागावाटपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस जागावाटपाबाबत इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत सातत्याने बैठका घेत आहे. यादरम्यान, टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत काँग्रेस आघाडी समितीच्या सदस्यांना भेटण्यासाठी टीएमसी आपला प्रतिनिधी पाठवणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच बंगालमधील जागावाटपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, याचे कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांनी 2019 मध्ये जिंकलेल्या बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांपैकी फक्त त्या दोन जागा काँग्रेसला देण्याची ऑफर आधीच दिली होती.  दरम्यान, काँग्रेस आघाडी समितीने यापूर्वी दिल्लीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, आरजेडी, सपा यांच्या नेत्यांची भेट घेतली होती. तसेच, समिती येत्या काही दिवसांत टीएमसी आणि जेडीयूशी चर्चा करण्याचा विचार करत आहे. 

इंडिया आघाडीत सामील असलेल्या पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू केली आहे. त्याची सुरुवात 7 जानेवारीला बिहारमधून झाली. यानंतर 8 जानेवारीला काँग्रेस आणि आपमध्ये बैठक झाली. यानंतर 9 जानेवारीला महाराष्ट्रातील जागांवर चर्चा झाली. दार्जिलिंग, पुरुलिया आणि रायगंज या जागांसह मुर्शिदाबादमधील तीन आणि मालदामधील दोन जागांचा समावेश असलेल्या बंगालमध्ये काँग्रेस 8 जागांची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या आहेत. 

ममता बॅनर्जींना काँग्रेसला त्याच दोन जागा द्यायच्या आहेत, ज्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. काँग्रेसला बंगालमध्ये केवळ दोन जागा देण्यामागचे सर्वात मोठे कारण पक्षाची कामगिरी असू शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी टीएमसीने 22 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी