शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

इंडिया आघाडीमध्ये बिघाडी? जागावाटपाचे समीकरण जुळेना; टीएमसी नेत्याने काँग्रेसवर केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 20:06 IST

देशात काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत.

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्वपक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली असून आता जागावाटपाची चर्चा सुरू आहे. भाजपनेही ४०० पारचा नारा देत लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे, इंडिया आघाडीमध्ये जागावाटपावरुन वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकला चलो रेच्या धर्तीवर तयारीत व्यस्त आहेत, तर बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरू आहेत.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी शनिवारी काँग्रेसवर आरोप केले. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षासोबत जागावाटपाची चर्चा करायची असेल तर जुन्या पक्षाला राज्यातील 'ग्राउंड रिअॅलिटी' स्वीकारावी लागेल. राज्यात भाजपला पाय रोवण्यास काँग्रेस मदत करत असल्याचा आरोपही घोष यांनी केला. काँग्रेसची राज्य युनिट भाजपला ऑक्सिजन देऊन आणि त्यांना येथे मजबूत पाय रोवून मदत करत आहे. हे चालणार नाही. आम्ही तयार आहोत. येथील सर्व ४२ लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार. काँग्रेसला राज्यातील ग्राऊंडच्या वास्तवाच्या आधारे जागावाटपावर सहमती द्यावी लागेल. मात्र, त्याऐवजी ते दबावाचे राजकारण करत आहेत, असंही घोष म्हणाले.

बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या स्थापनेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर दुसरीकडे भाजप आणि जेडीयूमधील जवळीक पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अमित शहा यांनी आधीच याचे संकेत दिले आहेत, बिहारमधील एनडीए मित्र पक्षाचे नेते नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होणार असल्याचा दावा करत आहेत, यामुळे इंडिया आघाडीत निवडणुकी अगोदर बिघाडी सुरू असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

टॅग्स :lok sabhaलोकसभाtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेस