शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

इंडिया आघाडीमध्ये बिघाडी? जागावाटपाचे समीकरण जुळेना; टीएमसी नेत्याने काँग्रेसवर केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 20:06 IST

देशात काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत.

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्वपक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली असून आता जागावाटपाची चर्चा सुरू आहे. भाजपनेही ४०० पारचा नारा देत लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे, इंडिया आघाडीमध्ये जागावाटपावरुन वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकला चलो रेच्या धर्तीवर तयारीत व्यस्त आहेत, तर बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरू आहेत.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी शनिवारी काँग्रेसवर आरोप केले. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षासोबत जागावाटपाची चर्चा करायची असेल तर जुन्या पक्षाला राज्यातील 'ग्राउंड रिअॅलिटी' स्वीकारावी लागेल. राज्यात भाजपला पाय रोवण्यास काँग्रेस मदत करत असल्याचा आरोपही घोष यांनी केला. काँग्रेसची राज्य युनिट भाजपला ऑक्सिजन देऊन आणि त्यांना येथे मजबूत पाय रोवून मदत करत आहे. हे चालणार नाही. आम्ही तयार आहोत. येथील सर्व ४२ लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार. काँग्रेसला राज्यातील ग्राऊंडच्या वास्तवाच्या आधारे जागावाटपावर सहमती द्यावी लागेल. मात्र, त्याऐवजी ते दबावाचे राजकारण करत आहेत, असंही घोष म्हणाले.

बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या स्थापनेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर दुसरीकडे भाजप आणि जेडीयूमधील जवळीक पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अमित शहा यांनी आधीच याचे संकेत दिले आहेत, बिहारमधील एनडीए मित्र पक्षाचे नेते नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होणार असल्याचा दावा करत आहेत, यामुळे इंडिया आघाडीत निवडणुकी अगोदर बिघाडी सुरू असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

टॅग्स :lok sabhaलोकसभाtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेस