शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

इंडिया आघाडीला चेहरा ठरवावा लागेल; बैठकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 11:30 AM

वेळापत्रकाप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होईल. त्यामुळे सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची आज नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीआधी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  'या आघाडीचा समन्वयक किंवा निमंत्रक ठरवण्याची गरज आहे. आघाडीचा एखादा चेहरा ठरवता येतो का, याचाही विचार आज ना उद्या करावा लागणार आहे,' असं मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे.

तुमच्या नावावर सर्वांचं एकमत झालं तर इंडिया आघाडीचं नेतृत्व करणार का, असा प्रश्नही या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, "उगाच काही तारे तोडण्याची गरज नाही. सगळ्यांशी बोलू आणि चर्चा करू. मी या बैठकीत काही गोष्टी सुचवणार आहे. पण मी हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे तुम्हाला कल्पना आहे की मला मुख्यमंत्रिपदही एक जबाबदारी म्हणून स्वीकारावं लागलं आणि वेळ येताच मी एका क्षणात ते पद सोडलं. त्यामुळे मी कोणतीही वेडीवाकडी स्वप्न पाहणार नाहीत. माझ्यासमोर माझा देश आहे आणि देशातील जनतेची स्वप्न आहेत. आम्ही आमची वैयक्तिक स्वप्न घेऊन पुढे जाण्याचा काही उपयोग नाही,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. 

"नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर आजच्या बैठकीत चर्चा होईल. डिसेंबर महिना अर्धा संपला आहे. आता लवकरच निवडणुकीचं वर्ष सुरू होईल. वेळापत्रकाप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होईल. या निवडणुकीच्या तयारीला आता सर्वांनी लागण्याची गरज आहे. बाकीच्यांच्या ज्या सूचना असतील त्यावर आमचं काय मत आहे, आमच्या काही सूचना आहेत, त्या आजच्या बैठकीत मांडल्या जातील," अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.

नितीश कुमारांच्या पोस्टरवर दिली प्रतिक्रिया 

इंडिया आघाडीच्या बैठकीआधी बिहारची राजधानी असलेल्या पाटणा इथं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टर्सची चर्चा होत आहे. पाटण्यात लावलेल्या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे की, "जर खरंच विजय हवा असेल तर एक निश्चय पाहिजे, एक नितीश पाहिजे." या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही जे लोक एकत्रित आलो आहोत, त्यातील कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा भरलेली नाही. आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. काल खासदारांचं निलंबन झालं, सभागृहातील चित्रही आपण पाहिलं. त्यामुळे देशातील लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही लोकशाही जिवंत ठेवली तर देश जगेल आणि ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत." 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabhaलोकसभाNew Delhiनवी दिल्ली