शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Agni-5 Ballistic Missile : भारताला मोठं यश! 5000KM पर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-5 चं यशस्वी परीक्षण, संपूर्ण आशिया, युरोप टप्प्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 22:13 IST

या सर्वांशिवाय, अग्नी-5 चे MIRV तंत्रज्ञानदेखील विशेष आहे. यामुळे, त्याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रे बसवता येतात. अशा परिस्थितीत हे क्षेपणास्त्र एकावेळी अनेक लक्ष्य भेदू शकते.

 नवी दिल्ली - भारतीय लष्कराची ताकद आता आणखी वाढली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक मिसाइल अग्नी-5 क्षेपणास्त्राचे बुधवारी यशस्वी परीक्षण करण्यात आले. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राची रेंज 5000 किमी असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 7.50 वाजता हे क्षेपणास्त्र लॉन्च करण्यात आले. याच वेळी, सरकारने पुन्हा स्पष्ट केले, की कोणत्याही शस्त्राचा पहिल्यांदा वापर केला जाणार नाही, हे भारताचे धोरण कायम राहील. अशात भारत केवळ आपली शक्ती वाढविण्यावर पूर्ण भर देईल. अग्नी 5 च्या यशस्वी परीक्षणामुळे भारताची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चीनपासून ते पाकिस्तानपर्यंत सर्वजण अस्वस्थ आहेत. एवढेच नाही, तर या क्षेपणास्त्राच्या खऱ्या रेंजबाबतही या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.

ही आहे अग्नी-5 ची खासियत -अग्नी-5 संदर्भात सांगण्यात आले आहे, की अग्नी-5 ची मारक क्षमता 5000 किमी असणार आहे. एवढेच नाही, तर त्याच्या इंजिनवर मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आल्याने, त्याची ताकदही मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे मानले जात आहे. अग्नी-5 चे इंजिन थ्री-स्टेज सॉलिड इंधनापासून बनविण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामुळे त्याची क्षमता आणि अचूकता ही, इतर क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्नी-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे (अग्नी-व्ही ICBM) वजन 50 हजार किलो आहे. ते 17.5 मीटर लांब आहे. त्याचा व्यास 2 मीटर म्हणजेच 6.7 फूट आहे. याच्या वर 1500 किलो वजनाचे अण्वस्त्र बसवले जाऊ शकते. या क्षेपणास्त्रामध्ये तीन-स्टेज रॉकेट बूस्टर आहे जे घन इंधनावर उडते. याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट जास्त आहे. म्हणजेच हे एका सेकंदात 8.16 किलोमीटरचे अंतर कापते.

अनेक टारगेट्स उद्धवस्त करण्याची क्षमता - या सर्वांशिवाय, अग्नी-5 चे MIRV तंत्रज्ञानदेखील विशेष आहे. यामुळे, त्याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रे बसवता येतात. अशा परिस्थितीत हे क्षेपणास्त्र एकावेळी अनेक लक्ष्य भेदू शकते. या क्षेपणास्त्राद्वारे संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिकेच्या काही भागांवर हल्ला केला जाऊ शकतो, असा दावा केला जात आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागchinaचीनPakistanपाकिस्तान