शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

Agni-5 Ballistic Missile : भारताला मोठं यश! 5000KM पर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-5 चं यशस्वी परीक्षण, संपूर्ण आशिया, युरोप टप्प्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 22:13 IST

या सर्वांशिवाय, अग्नी-5 चे MIRV तंत्रज्ञानदेखील विशेष आहे. यामुळे, त्याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रे बसवता येतात. अशा परिस्थितीत हे क्षेपणास्त्र एकावेळी अनेक लक्ष्य भेदू शकते.

 नवी दिल्ली - भारतीय लष्कराची ताकद आता आणखी वाढली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक मिसाइल अग्नी-5 क्षेपणास्त्राचे बुधवारी यशस्वी परीक्षण करण्यात आले. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राची रेंज 5000 किमी असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 7.50 वाजता हे क्षेपणास्त्र लॉन्च करण्यात आले. याच वेळी, सरकारने पुन्हा स्पष्ट केले, की कोणत्याही शस्त्राचा पहिल्यांदा वापर केला जाणार नाही, हे भारताचे धोरण कायम राहील. अशात भारत केवळ आपली शक्ती वाढविण्यावर पूर्ण भर देईल. अग्नी 5 च्या यशस्वी परीक्षणामुळे भारताची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चीनपासून ते पाकिस्तानपर्यंत सर्वजण अस्वस्थ आहेत. एवढेच नाही, तर या क्षेपणास्त्राच्या खऱ्या रेंजबाबतही या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.

ही आहे अग्नी-5 ची खासियत -अग्नी-5 संदर्भात सांगण्यात आले आहे, की अग्नी-5 ची मारक क्षमता 5000 किमी असणार आहे. एवढेच नाही, तर त्याच्या इंजिनवर मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आल्याने, त्याची ताकदही मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे मानले जात आहे. अग्नी-5 चे इंजिन थ्री-स्टेज सॉलिड इंधनापासून बनविण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामुळे त्याची क्षमता आणि अचूकता ही, इतर क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्नी-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे (अग्नी-व्ही ICBM) वजन 50 हजार किलो आहे. ते 17.5 मीटर लांब आहे. त्याचा व्यास 2 मीटर म्हणजेच 6.7 फूट आहे. याच्या वर 1500 किलो वजनाचे अण्वस्त्र बसवले जाऊ शकते. या क्षेपणास्त्रामध्ये तीन-स्टेज रॉकेट बूस्टर आहे जे घन इंधनावर उडते. याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट जास्त आहे. म्हणजेच हे एका सेकंदात 8.16 किलोमीटरचे अंतर कापते.

अनेक टारगेट्स उद्धवस्त करण्याची क्षमता - या सर्वांशिवाय, अग्नी-5 चे MIRV तंत्रज्ञानदेखील विशेष आहे. यामुळे, त्याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रे बसवता येतात. अशा परिस्थितीत हे क्षेपणास्त्र एकावेळी अनेक लक्ष्य भेदू शकते. या क्षेपणास्त्राद्वारे संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिकेच्या काही भागांवर हल्ला केला जाऊ शकतो, असा दावा केला जात आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागchinaचीनPakistanपाकिस्तान