शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Agni-5 Ballistic Missile : भारताला मोठं यश! 5000KM पर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-5 चं यशस्वी परीक्षण, संपूर्ण आशिया, युरोप टप्प्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 22:13 IST

या सर्वांशिवाय, अग्नी-5 चे MIRV तंत्रज्ञानदेखील विशेष आहे. यामुळे, त्याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रे बसवता येतात. अशा परिस्थितीत हे क्षेपणास्त्र एकावेळी अनेक लक्ष्य भेदू शकते.

 नवी दिल्ली - भारतीय लष्कराची ताकद आता आणखी वाढली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक मिसाइल अग्नी-5 क्षेपणास्त्राचे बुधवारी यशस्वी परीक्षण करण्यात आले. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राची रेंज 5000 किमी असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 7.50 वाजता हे क्षेपणास्त्र लॉन्च करण्यात आले. याच वेळी, सरकारने पुन्हा स्पष्ट केले, की कोणत्याही शस्त्राचा पहिल्यांदा वापर केला जाणार नाही, हे भारताचे धोरण कायम राहील. अशात भारत केवळ आपली शक्ती वाढविण्यावर पूर्ण भर देईल. अग्नी 5 च्या यशस्वी परीक्षणामुळे भारताची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चीनपासून ते पाकिस्तानपर्यंत सर्वजण अस्वस्थ आहेत. एवढेच नाही, तर या क्षेपणास्त्राच्या खऱ्या रेंजबाबतही या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.

ही आहे अग्नी-5 ची खासियत -अग्नी-5 संदर्भात सांगण्यात आले आहे, की अग्नी-5 ची मारक क्षमता 5000 किमी असणार आहे. एवढेच नाही, तर त्याच्या इंजिनवर मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आल्याने, त्याची ताकदही मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे मानले जात आहे. अग्नी-5 चे इंजिन थ्री-स्टेज सॉलिड इंधनापासून बनविण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामुळे त्याची क्षमता आणि अचूकता ही, इतर क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्नी-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे (अग्नी-व्ही ICBM) वजन 50 हजार किलो आहे. ते 17.5 मीटर लांब आहे. त्याचा व्यास 2 मीटर म्हणजेच 6.7 फूट आहे. याच्या वर 1500 किलो वजनाचे अण्वस्त्र बसवले जाऊ शकते. या क्षेपणास्त्रामध्ये तीन-स्टेज रॉकेट बूस्टर आहे जे घन इंधनावर उडते. याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट जास्त आहे. म्हणजेच हे एका सेकंदात 8.16 किलोमीटरचे अंतर कापते.

अनेक टारगेट्स उद्धवस्त करण्याची क्षमता - या सर्वांशिवाय, अग्नी-5 चे MIRV तंत्रज्ञानदेखील विशेष आहे. यामुळे, त्याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रे बसवता येतात. अशा परिस्थितीत हे क्षेपणास्त्र एकावेळी अनेक लक्ष्य भेदू शकते. या क्षेपणास्त्राद्वारे संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिकेच्या काही भागांवर हल्ला केला जाऊ शकतो, असा दावा केला जात आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागchinaचीनPakistanपाकिस्तान