शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बंगालमध्ये 'इंडिया' आघाडी संकटात! ममत बॅनर्जी म्हणाल्या, 'मी युतीची नावे सांगितली, पण बैठकीत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 19:44 IST

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीत जागावाटपावर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी २२ जानेवारीला आघाडीत समाविष्ट असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर निशाणा साधला आणि मी त्यांच्याविरोधात ३४ वर्षे लढत असल्याचे सांगितले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी पश्चिम बंगालमध्ये ३४ वर्षे डाव्यांच्या विरोधात लढले, पण आता मला ते 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत अटी घालण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ज्यांच्या विरोधात मी ३४ वर्षे लढले त्यांच्याशी मी सहमत नाही.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पीएम मोदींची मोठी घोषणा! जाणून घ्या काय आहे 'प्रधानमंत्री सूर्यादय योजना'

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी युतीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रेटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स’ सुचवले होते, पण जेव्हा मी बैठकीला गेले तेव्हा मला दिसले की डावे पक्ष त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेत असल्याने मी भाजपशी लढत आहे, पण काही लोकांना जागावाटपावरून आमचे ऐकायचे नाही, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.

टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी काही दिवसापूर्वी जागावाटपावरुन प्रतिक्रीया दिली होती. 'बंगालमधील लोकसभेच्या ४२ जागांपैकी पक्षाने काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या आहेत. या कारणास्तव आम्ही काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही.

ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी १९ जानेवारी रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत सांगितले की, विरोधी आघाडी 'इंडिया'मध्ये पक्षाला योग्य महत्त्व न दिल्यास टीएमसी लोकसभेच्या सर्व ४२ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, यामुळे आता इंडिया आघाडीत जागावाटपावरुन वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस