शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडी स्वत:ला भारत म्हणू शकते, शशी थरुर यांनी फुलफॉर्मसह सुचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 21:48 IST

इंडिया विरुद्ध भारत या संदर्भात सध्या देशात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

इंडिया विरुद्ध भारत या राजकीय आरोप-प्रत्यारोपात  काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही उडी घेतली आहे. बुधवारी त्यांनी विरोधी आघाडी इंडियाला सुचवले की आपण स्वतःला भारत म्हणू शकतो. थरूर यांनी भारताचा फुलफॉर्मही सांगितला. असं केल्याने सत्ताधारी कदाचित पक्षाचे नाव बदलण्याचा हा खेळ थांबवतील असा दावाही शशी थरूर यांनी केला.

सायबरसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करणार; कॅबिनेट बैठकीत घेतले 'हे' निर्णय

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये थरुर म्हणाले, आम्ही निश्चितपणे स्वतःला अलायन्स फॉर बेटरमेंट, हार्मनी आणि रिस्पॉन्सिबल अॅडव्हान्समेंट फॉर टुमारो (इंडिया) म्हणू शकतो. मग कदाचित सत्ताधारी पक्ष हा नाव बदलण्याचा खेळ थांबवेल.

बुधवारी खासदार शशी थरूर यांनी २०१५ ची आणखी एक घटना एका शेअर केली, जेव्हा एका जनहित याचिकाद्वारे देशाचे नाव बदलून फक्त भारत करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर केंद्राने सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १.१ मध्ये बदल करून देशाचे नाव बदलण्याची गरज नाही. राज्यघटनेच्या कलम १.१ मध्ये देशाच्या अधिकृत नावासाठी इंडिया आणि भारत या शब्दांचा उल्लेख आहे.

ही पोस्ट शेअर करताना शशी थरूर म्हणाले, कोणत्याही टिप्पणीची गरज नाही. यावर केंद्र सरकारच्या संमतीने मी खूश आहे. घटनात्मकदृष्ट्या इंडियाला भारत म्हणण्यास हरकत नाही. मला आशा आहे की, देशाचे ब्रँड व्हॅल्यू असलेल्या इंडिया हे नाव पूर्णपणे सोडू नये. इतिहास जिवंत करणाऱ्या आणि जगभर ओळखल्या जाणार्‍या दोन्ही नावांचा वापर करण्यास आपण परवानगी दिली पाहिजे.

देशाचे नाव भारत असावे की इंडिया की दोन्ही असा वाद सध्या देशात सुरू आहे. पण या वादात एक वस्तुस्थिती अशी आहे की, हे दोन्ही शब्द आपल्या राज्यघटनेत आधीच लिहिलेले आहेत. इंडियाचा म्हणजेच भारताचा उल्लेख देशाच्या संविधानात आधीच केलेला आहे. इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे राज्यघटनेत नोंदलेली आहेत आणि एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, मग वाद कशासाठी?, असा सवालही थरुर यांनी केला.

इंडिया विरुद्ध भारत लढतीत भाजप असो की काँग्रेस, प्रत्येकाने यू-टर्न घेतला आहे. देशाला इंडिया म्हणावे की भारत या विषयावर ७४ वर्षांपूर्वी १८ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेत चर्चा झाली. दोन्ही नावांसाठी वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले. पण शेवटी राज्यघटनेत इंडिया म्हणजे भारत असे लिहून वाद संपवला. मात्र गेल्या ७४ वर्षांत नावाचा वाद अनेकवेळा निर्माण झाला.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस