शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

इंडिया आघाडी स्वत:ला भारत म्हणू शकते, शशी थरुर यांनी फुलफॉर्मसह सुचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 21:48 IST

इंडिया विरुद्ध भारत या संदर्भात सध्या देशात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

इंडिया विरुद्ध भारत या राजकीय आरोप-प्रत्यारोपात  काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही उडी घेतली आहे. बुधवारी त्यांनी विरोधी आघाडी इंडियाला सुचवले की आपण स्वतःला भारत म्हणू शकतो. थरूर यांनी भारताचा फुलफॉर्मही सांगितला. असं केल्याने सत्ताधारी कदाचित पक्षाचे नाव बदलण्याचा हा खेळ थांबवतील असा दावाही शशी थरूर यांनी केला.

सायबरसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करणार; कॅबिनेट बैठकीत घेतले 'हे' निर्णय

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये थरुर म्हणाले, आम्ही निश्चितपणे स्वतःला अलायन्स फॉर बेटरमेंट, हार्मनी आणि रिस्पॉन्सिबल अॅडव्हान्समेंट फॉर टुमारो (इंडिया) म्हणू शकतो. मग कदाचित सत्ताधारी पक्ष हा नाव बदलण्याचा खेळ थांबवेल.

बुधवारी खासदार शशी थरूर यांनी २०१५ ची आणखी एक घटना एका शेअर केली, जेव्हा एका जनहित याचिकाद्वारे देशाचे नाव बदलून फक्त भारत करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर केंद्राने सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १.१ मध्ये बदल करून देशाचे नाव बदलण्याची गरज नाही. राज्यघटनेच्या कलम १.१ मध्ये देशाच्या अधिकृत नावासाठी इंडिया आणि भारत या शब्दांचा उल्लेख आहे.

ही पोस्ट शेअर करताना शशी थरूर म्हणाले, कोणत्याही टिप्पणीची गरज नाही. यावर केंद्र सरकारच्या संमतीने मी खूश आहे. घटनात्मकदृष्ट्या इंडियाला भारत म्हणण्यास हरकत नाही. मला आशा आहे की, देशाचे ब्रँड व्हॅल्यू असलेल्या इंडिया हे नाव पूर्णपणे सोडू नये. इतिहास जिवंत करणाऱ्या आणि जगभर ओळखल्या जाणार्‍या दोन्ही नावांचा वापर करण्यास आपण परवानगी दिली पाहिजे.

देशाचे नाव भारत असावे की इंडिया की दोन्ही असा वाद सध्या देशात सुरू आहे. पण या वादात एक वस्तुस्थिती अशी आहे की, हे दोन्ही शब्द आपल्या राज्यघटनेत आधीच लिहिलेले आहेत. इंडियाचा म्हणजेच भारताचा उल्लेख देशाच्या संविधानात आधीच केलेला आहे. इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे राज्यघटनेत नोंदलेली आहेत आणि एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, मग वाद कशासाठी?, असा सवालही थरुर यांनी केला.

इंडिया विरुद्ध भारत लढतीत भाजप असो की काँग्रेस, प्रत्येकाने यू-टर्न घेतला आहे. देशाला इंडिया म्हणावे की भारत या विषयावर ७४ वर्षांपूर्वी १८ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेत चर्चा झाली. दोन्ही नावांसाठी वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले. पण शेवटी राज्यघटनेत इंडिया म्हणजे भारत असे लिहून वाद संपवला. मात्र गेल्या ७४ वर्षांत नावाचा वाद अनेकवेळा निर्माण झाला.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस