शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडी स्वत:ला भारत म्हणू शकते, शशी थरुर यांनी फुलफॉर्मसह सुचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 21:48 IST

इंडिया विरुद्ध भारत या संदर्भात सध्या देशात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

इंडिया विरुद्ध भारत या राजकीय आरोप-प्रत्यारोपात  काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही उडी घेतली आहे. बुधवारी त्यांनी विरोधी आघाडी इंडियाला सुचवले की आपण स्वतःला भारत म्हणू शकतो. थरूर यांनी भारताचा फुलफॉर्मही सांगितला. असं केल्याने सत्ताधारी कदाचित पक्षाचे नाव बदलण्याचा हा खेळ थांबवतील असा दावाही शशी थरूर यांनी केला.

सायबरसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करणार; कॅबिनेट बैठकीत घेतले 'हे' निर्णय

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये थरुर म्हणाले, आम्ही निश्चितपणे स्वतःला अलायन्स फॉर बेटरमेंट, हार्मनी आणि रिस्पॉन्सिबल अॅडव्हान्समेंट फॉर टुमारो (इंडिया) म्हणू शकतो. मग कदाचित सत्ताधारी पक्ष हा नाव बदलण्याचा खेळ थांबवेल.

बुधवारी खासदार शशी थरूर यांनी २०१५ ची आणखी एक घटना एका शेअर केली, जेव्हा एका जनहित याचिकाद्वारे देशाचे नाव बदलून फक्त भारत करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर केंद्राने सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १.१ मध्ये बदल करून देशाचे नाव बदलण्याची गरज नाही. राज्यघटनेच्या कलम १.१ मध्ये देशाच्या अधिकृत नावासाठी इंडिया आणि भारत या शब्दांचा उल्लेख आहे.

ही पोस्ट शेअर करताना शशी थरूर म्हणाले, कोणत्याही टिप्पणीची गरज नाही. यावर केंद्र सरकारच्या संमतीने मी खूश आहे. घटनात्मकदृष्ट्या इंडियाला भारत म्हणण्यास हरकत नाही. मला आशा आहे की, देशाचे ब्रँड व्हॅल्यू असलेल्या इंडिया हे नाव पूर्णपणे सोडू नये. इतिहास जिवंत करणाऱ्या आणि जगभर ओळखल्या जाणार्‍या दोन्ही नावांचा वापर करण्यास आपण परवानगी दिली पाहिजे.

देशाचे नाव भारत असावे की इंडिया की दोन्ही असा वाद सध्या देशात सुरू आहे. पण या वादात एक वस्तुस्थिती अशी आहे की, हे दोन्ही शब्द आपल्या राज्यघटनेत आधीच लिहिलेले आहेत. इंडियाचा म्हणजेच भारताचा उल्लेख देशाच्या संविधानात आधीच केलेला आहे. इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे राज्यघटनेत नोंदलेली आहेत आणि एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, मग वाद कशासाठी?, असा सवालही थरुर यांनी केला.

इंडिया विरुद्ध भारत लढतीत भाजप असो की काँग्रेस, प्रत्येकाने यू-टर्न घेतला आहे. देशाला इंडिया म्हणावे की भारत या विषयावर ७४ वर्षांपूर्वी १८ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेत चर्चा झाली. दोन्ही नावांसाठी वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले. पण शेवटी राज्यघटनेत इंडिया म्हणजे भारत असे लिहून वाद संपवला. मात्र गेल्या ७४ वर्षांत नावाचा वाद अनेकवेळा निर्माण झाला.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस