शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प नकोच!

By admin | Updated: July 14, 2016 03:25 IST

रेल्वे खात्याचा स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करून तो संसदेकडून मंजूर करून घेण्याची गेली ९२ वर्षे रूढ असलेली प्रथा बंद करावी आणि सरकारच्या अन्य कोणत्याही खात्याप्रमाणे रेल्वेसाठीची

नवी दिल्ली : रेल्वे खात्याचा स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करून तो संसदेकडून मंजूर करून घेण्याची गेली ९२ वर्षे रूढ असलेली प्रथा बंद करावी आणि सरकारच्या अन्य कोणत्याही खात्याप्रमाणे रेल्वेसाठीची तरतूदही सर्वसाधारण केंद्रीय अर्थसंकल्पातूनच केली जावी, अशी सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.माहीतगार सूत्रांनुसार प्रभू यांनी अलीकडेच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना याविषयी पत्र लिहिले आहे. रेल्वेमंत्र्यांच्या या सूचनेवर वित्त मंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.रेल्वे अर्थसंकल्प वेगळा न ठेवता, तो सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलिन केल्याने सर्व प्रकारच्या परिवहन सेवांचे मिळून एकच समन्वित राष्ट्रीय धोरण आखणे सुलभ होईल. शिवाय रेल्वेच्या कारभारातील राजकीय हस्तक्षेपही त्यामुळे दूर होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी पत्रात लिहिले असल्याचे समजते.मध्यंतरी नीति आयोगाचे सदस्य विवेक देवरॉय यांनीही असेच विचार व्यक्त केले होते व पंतप्रधान कार्यालयाने त्यावर रेल्वे मंत्रालयाचे मत मागितले होते. आता खुद्द रेल्वेमंत्र्यांनीच यास अनुकूलता दाखविल्याने बहुधा आगामी वित्तीय वर्षासाठी स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प न मांडला जाण्याचीच शक्यता अधिक आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना १९२४-२५ या वित्तीय वर्षासाठी सर्वप्रथम स्वतंत्र रेल्वे अर्थ संकल्प मांडला गेला व तेव्हापासून गेली ९० वर्षे दरवर्षी तो तसाच मांडला जात आहे, परंतु आता परिस्थिती खूपच बदलली आहे. केंद्र सरकारच्या एकूण महसुलात रेल्वेचा वाटा पूर्वीइतका राहिलेला नाही, उलट रेल्वे सोडून इतर सार्वजनिक उपक्रमांचा व्याप रेल्वेहून मोठा झाला आहे.रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार स्वतंत्र अर्थ संकल्पामुळे स्वत:च्या गरजा प्रामुख्याने स्वत:च्याच उत्पन्नातून भागविण्याची जबाबदारी रेल्वेवर येते. रेल्वेची वित्तीय स्थिती उत्तरोत्तर खालावत असून, त्या उत्पन्नाच्या साधनांतून रेल्वेचा डोलारा सांभाळणे कठीण होत आहे. त्या दृष्टीने रेल्वे अर्थसंकल्पही सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट करणे हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल ठरेल. त्यामुळे संपूर्ण वित्तीय बोजा एकट्या रेल्वे मंत्रालयास सोसावा न लागता, तो संपूर्ण केंद्र सरकारकडे जाईल. त्यामुळे गरजेनुसार सरकारकडून रेल्वेला अधिक सुलभपणे निधी मिळू शकेल.देशात रेल्वे हा सर्वाधिक लोकांना रोजगार देणारा सरकारी उपक्रम आहे. स्वतंत्र रेल्वे अर्थ संकल्पास सोडचिठ्ठी देण्याच्या कल्पनेस रेल्वेतील कामगार संघटनांचाही तत्त्वत: पाठिंबा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)घटता महसूल व सतत वाढत चाललेला ‘आॅपरेटिंग रेश्यो’, यामुळे रेल्वे वित्तीय दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे.रेल्वेचा ‘आॅपरेटिंग रेश्यो’ सध्या ११० आहे. म्हणजे १०० रुपये कमाविण्यासाठी रेल्वे ११० रुपये खर्च करीत आहे.रेल्वेला मिळणाऱ्या प्रत्येक रुपयातील ५५ पैसे कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शवर खर्च होतात.हाती घेतलेली विविध कामे पूर्ण करण्यासाठी रेल्वेला ४.८३ लाख कोटी रुपये एवढा निधी लागणार आहे. तो पूर्र्णपणे स्वत: उभा करणे रेल्वेच्या आवाक्याच्या बाहेर आहे.