शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 04:53 IST

विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत उभारणे आवश्यक आहे, असे त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

श्रीनगर : विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत उभारणे आवश्यक आहे, असे त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, काश्मीरमधील एकाही प्रमुख नेत्याने काश्मिरी पंडितांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण आजवर दिलेले नव्हते.या पंडितांना सुरक्षा पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम आम्ही करणार आहोत. या पंडितांची घरे बळकावणाऱ्यांनी आता त्यांना पुन्हा तेथे राहायला येण्यासाठी बोलावले पाहिजे. असे होण्याकरिता फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, तसेच हुरियत नेत्यांनी काश्मिरीमधील इतर लोकांना राजी केले पाहिजे. हे माझे काम नाही तर काश्मीरमधील नेत्यांनी हे करणे अपेक्षित आहे. काश्मिरी पंडितांना त्यांच्याच राज्यात पर्यायी घर, शाळा व सुरक्षा मिळावी इतकाच आमचा प्रयत्न आहे. काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती स्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पुलवामा व अन्य काही ठिकाणांचा आम्ही विचार चालविला आहे. काश्मिरी पंडितांना हव्या त्या ठिकाणी या वसाहती उभारून तेथे त्यांना मोफत घरे देण्यात येतील.>अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींनी विश्वास गमावलाराज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, ओमर असो वा फारुक अब्दुल्ला यांच्या पक्षाला दोन ते अडीच टक्के मतदान होते. मेहबुबा मुफ्ती यांच्या मतदारसंघात फक्त २ टक्केच मतदान झाले. श्रीनगरमध्ये फारुक अब्दुल्ला अगदी कमी मताधिक्याने निवडून येत असत.पूर्वी तिथे ६ टक्के मतदान होत असे. आता फारुक अब्दुल्ला १० ते १२ टक्के मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. हे सर्व काश्मिरी नेते स्थानिक जनतेचा विश्वास गमावून बसले आहेत. काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे हुरियत नेते मिरवाईज यांनी म्हटले होते. त्याबाबत मी नव्हे तर केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे.