शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 04:53 IST

विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत उभारणे आवश्यक आहे, असे त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

श्रीनगर : विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत उभारणे आवश्यक आहे, असे त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, काश्मीरमधील एकाही प्रमुख नेत्याने काश्मिरी पंडितांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण आजवर दिलेले नव्हते.या पंडितांना सुरक्षा पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम आम्ही करणार आहोत. या पंडितांची घरे बळकावणाऱ्यांनी आता त्यांना पुन्हा तेथे राहायला येण्यासाठी बोलावले पाहिजे. असे होण्याकरिता फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, तसेच हुरियत नेत्यांनी काश्मिरीमधील इतर लोकांना राजी केले पाहिजे. हे माझे काम नाही तर काश्मीरमधील नेत्यांनी हे करणे अपेक्षित आहे. काश्मिरी पंडितांना त्यांच्याच राज्यात पर्यायी घर, शाळा व सुरक्षा मिळावी इतकाच आमचा प्रयत्न आहे. काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती स्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पुलवामा व अन्य काही ठिकाणांचा आम्ही विचार चालविला आहे. काश्मिरी पंडितांना हव्या त्या ठिकाणी या वसाहती उभारून तेथे त्यांना मोफत घरे देण्यात येतील.>अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींनी विश्वास गमावलाराज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, ओमर असो वा फारुक अब्दुल्ला यांच्या पक्षाला दोन ते अडीच टक्के मतदान होते. मेहबुबा मुफ्ती यांच्या मतदारसंघात फक्त २ टक्केच मतदान झाले. श्रीनगरमध्ये फारुक अब्दुल्ला अगदी कमी मताधिक्याने निवडून येत असत.पूर्वी तिथे ६ टक्के मतदान होत असे. आता फारुक अब्दुल्ला १० ते १२ टक्के मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. हे सर्व काश्मिरी नेते स्थानिक जनतेचा विश्वास गमावून बसले आहेत. काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे हुरियत नेते मिरवाईज यांनी म्हटले होते. त्याबाबत मी नव्हे तर केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे.