शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 04:53 IST

विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत उभारणे आवश्यक आहे, असे त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

श्रीनगर : विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत उभारणे आवश्यक आहे, असे त्या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, काश्मीरमधील एकाही प्रमुख नेत्याने काश्मिरी पंडितांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण आजवर दिलेले नव्हते.या पंडितांना सुरक्षा पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम आम्ही करणार आहोत. या पंडितांची घरे बळकावणाऱ्यांनी आता त्यांना पुन्हा तेथे राहायला येण्यासाठी बोलावले पाहिजे. असे होण्याकरिता फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, तसेच हुरियत नेत्यांनी काश्मिरीमधील इतर लोकांना राजी केले पाहिजे. हे माझे काम नाही तर काश्मीरमधील नेत्यांनी हे करणे अपेक्षित आहे. काश्मिरी पंडितांना त्यांच्याच राज्यात पर्यायी घर, शाळा व सुरक्षा मिळावी इतकाच आमचा प्रयत्न आहे. काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती स्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पुलवामा व अन्य काही ठिकाणांचा आम्ही विचार चालविला आहे. काश्मिरी पंडितांना हव्या त्या ठिकाणी या वसाहती उभारून तेथे त्यांना मोफत घरे देण्यात येतील.>अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींनी विश्वास गमावलाराज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, ओमर असो वा फारुक अब्दुल्ला यांच्या पक्षाला दोन ते अडीच टक्के मतदान होते. मेहबुबा मुफ्ती यांच्या मतदारसंघात फक्त २ टक्केच मतदान झाले. श्रीनगरमध्ये फारुक अब्दुल्ला अगदी कमी मताधिक्याने निवडून येत असत.पूर्वी तिथे ६ टक्के मतदान होत असे. आता फारुक अब्दुल्ला १० ते १२ टक्के मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. हे सर्व काश्मिरी नेते स्थानिक जनतेचा विश्वास गमावून बसले आहेत. काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे हुरियत नेते मिरवाईज यांनी म्हटले होते. त्याबाबत मी नव्हे तर केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे.