शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Independence Day: भारतात सहभागी होण्यास कोणत्या संस्थानांनी विरोध केला होता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 14:34 IST

बिकानेर, बडोदा आणि राजस्थानातील काही इतर संस्थानांनी भारतात विलिन होण्याच प्रथम निर्णय घेतला. मात्र काही संस्थानांना स्वतंत्र राहायचे होते. त्यांनी भारतात सामिल व्हायला नकार दिला.

मुंबई- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र भारताचे आजचे स्वरुप येण्यासाठी स्वातंत्र्यानंतरही सरकारला अथक प्रयत्न करावे लागले. ब्रिटिशांनी ब्रिटिश इंडिया स्वाधीन केला तरी त्याबरोबर 500 हून अधिक संस्थाने कशी विलिन करुन घ्यायची हा प्रश्न होताच. या संस्थांनांचे व इंग्रजांचे संबंध अत्यंत गुंतागुंतीचे होते. काही संस्थानांना अंतर्गत स्वायत्तता होती, काही संस्थानांना अंशतः स्वातंत्र्य होते तर काही संस्थानांकडे ब्रिटिश लष्करी मदतीच्यादृष्टीने पाहात होते.

या गुंतागुंतीच्या संबंधांमुळे तसेच प्रत्येक संस्थानाशी वेगळ्या प्रकारचे संबंध ब्रिटिशांनी ठेवल्य़ामुळे स्वातंत्र्यानंतर त्यांना विलिन करुन घेणे अत्यंत जटील स्वरुपाचे काम झाले. त्यासाठी विशेष विभागाचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे देण्यात आले तर व्ही. पी. मेनन त्याचे सेक्रेटरी झाले. लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानिकांचे भारताच्या बाजून मन वळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. त्याला यशही येऊ लागले. बिकानेर, बडोदा आणि राजस्थानातील काही इतर संस्थानांनी भारतात विलिन होण्याच प्रथम निर्णय घेतला. मात्र काही संस्थानांना स्वतंत्र राहायचे होते. त्यांनी भारतात सामिल व्हायला नकार दिला.

त्रावणकोर- हे भारताच्या दक्षिणेचे सध्याच्या केरळ राज्यातील प्रमुख संस्थान होते. या संस्थानाच्या प्रमुखांनी भारत या संघराज्यालाच आव्हान दिले. त्रावणकोर राज्याचे दिवाण सी. पी. रामस्वामी अय्यर यांनी संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा मनसुबा ठेवला होता. तसेच त्यांनी भारतात सामिल होऊ नये यासाठी बॅ. महंमद अली जिनादेखिल प्रयत्न करत होते. 1947 साली जुलै महिन्यापर्यंत त्यांनी स्वतंत्र राहाण्याचा निर्णय सोडला नव्हता. मात्र केरळ सोशलिस्ट पार्टीच्या सदस्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय लवकरच बदलला. 30 जुलै 1947 रोजी त्रावणकोर भारतात सामिल झाले.

जोधपूर- जोधपूरचे महाराज हनवंत सिंग स्वतः हिंदू, त्यांची प्रजाही हिंदू होती. मात्र त्यांना अचानक आपण पाकिस्तानात सामिल व्हावे असे वाटू लागले. त्यांच्या संस्थानाची सीमाही पाकिस्तानाला चिकटूनच होती. महमंद अली जिना यांनी महाराजांना तुम्ही आमच्या देशात आलात तर सोयीसुविधा देऊ असे आश्वासन दिले होते. याची कल्पना येताच सरदार वल्लभभाई पटेल यांनी तात्काळ राजाशी संपर्क करुन भारतात राहाणे कसे योग्य आहे आणि पाकिस्तानात गेल्यामुळे होणारे तोटे समजावून सांगितले. अत्यंत ना्टयमयरितीने महाराजा  हनवंतसिंग यांनी भारतात सामिल होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.

भोपाळ- भोपाळ हे मध्य भारतातील महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानचे नवाब हमिदुल्लाह खान यांनी भारतात सामिल होण्यास नकार दिला होता. ते मुस्लीम लिगच्या अत्यंत जवळचे होते त्याचप्रमाणे काँग्रेसला त्यांचा विरोध होता. मात्र जुलै 1947 मध्ये इतर संस्थानिकांप्रमाणे त्यांनी भारतात सामिल होण्याचा निर्णय घेतला.

हैदराबाद- दख्खनच्या पठारावरील हे एक मोठे संस्थान होते. आजच्या महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक राज्यातील अनेक जिल्हे या संस्थानात येत होते. मात्र शेवटचे निजाम मिर उस्मान अली यांनी भारतात सामिल होण्यास नकार दिला होता. निजामाला पाकिस्तानातून पाठिंबाही मिळतो.  13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने हैदराबाद संस्थानाविरोधात ऑपरेशन पोलो ही मोहीम राबविली आणि भारतीय लष्कराने केवळ चार दिवसांमध्ये हैदराबादवर ताबा मिळवला.

जुनागढ- 15 ऑगस्ट 1947पूर्वी भारतात सामिल न झालेल्या संस्थानांमध्ये हैदराबादबरोबर जुनागढही होते. या संस्थानाची प्रजा बहुतांश हिंदू होती मात्र त्याचे नवाब मोहंमद महाबत खानजी (तिसरे) मुस्लीम होते. 1947 साली शाहनवाज भुट्टो यांनी जुनागढच्या नवाबावर दबाव आणून संस्थान पाकिस्तानात सामिल करण्याचा निर्णय घ्यायला लावला. पाकिस्तानने त्याला मान्यता दिल्यावर भारतीय नेत्यांनी त्याला विरोध केला. हा प्रकार जिना यांच्या द्विराष्ट्र सिद्धांताच्या विरोधात असल्याची भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली. यासर्व घडामोडींमध्ये जुनागढची स्थिती बिघडली आणि नवाब कराचीला पळून गेला. त्यानंतर मोडकळीस आलेल्या संस्थानाच्या दिवाणाने भारतात सामिल होण्याचा निर्णय दिला आणि फेब्रुवारी 1948 मध्ये जनमताची चाचणी घेण्यात आली. जुनागढच्या 91 टक्के लोकांनी संस्थान भारतात असावे असा निर्णय घेतला आणि जुनागढ भारतात सामिल झाले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसIndiaभारतPakistanपाकिस्तान