शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला पाकला गंभीर इशारा; मोदी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 10:40 IST

काही लोकांनी फक्त भारताला नाही तर शेजारील देशांनाही दहशतवादाने बरबाद करुन टाकलं आहे. बांग्लादेश, अफगाणिस्तानही दहशतवादाशी लढतोय.

नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला घेरलं. दहशतवादाने फक्त भारत नाही तर दक्षिण आशियातील अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका या देशांनाही उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळे दहशत पसरविण्याचं काम करणाऱ्या अशा लोकांना उखडून टाकायला हवं असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीपाकिस्तानला नाव न घेता दिला. 

यावेळी भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, काही लोकांनी फक्त भारताला नाही तर शेजारील देशांनाही दहशतवादाने बरबाद करुन टाकलं आहे. बांग्लादेश, अफगाणिस्तानही दहशतवादाशी लढतोय. श्रीलंकेत चर्चमध्ये झालेल्या स्फोटात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या अशा लोकांना उखडून टाकलं पाहिजे. दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्यांना उघड केले पाहिजे. जगातील सर्व देशांनी यासाठी एकत्र येत दहशतवादाचा सामना करायला हवा. 

दरम्यान जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यावरुन पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. पाकिस्तान युद्धाची भाषा बोलू लागला आहे. बुधवारी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जर युद्ध झालं तर त्यासाठी जगातील अन्य देश जबाबदार असतील असं वक्तव्य केलं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून मोठी कारवाई होऊ शकते या भीतीने पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. तर दुसरीकडे भारताला युद्धाची धमकी देत आहे. 

भारतानं असं काही केल्यास आम्हीही युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं इम्रान खान म्हणाले होते. तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध झाल्यास त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल. पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा हा जगातल्या प्रत्येक स्तरावर उपस्थित करत राहील. गरज पडल्यास आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाऊ, येत्या काळात लंडनमध्ये मोठी रॅली काढण्यात येणार आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्राची महासभा सुरू असेल, तर दुसरीकडे पाकिस्तान विरोध प्रदर्शन करेल. पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर सैरभैर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आगामी काळात जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद