शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 10:15 IST

Independence Day 2025:  लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्याची आणि देशवासियांना संबोधित करण्याची ही परंपरा १९४७ पासून म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून अखंड सुरु आहे.

दीडशे वर्षांची ब्रिटिशांची राजवट उलथवून लावत १५ ऑगस्टच्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. १५ ऑगस्ट ही भारतासाठी केवळ तारीख नाहीय तर स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्याचा मान हा या दिवशी पंतप्रधानांना मिळतो. काही पंतप्रधानांनी एकापेक्षा जास्त वेळा या ठिकाणावरून तिरंगा फडकविला आहे. परंतू, असे दोन पंतप्रधान आहेत, ज्यांच्या भाग्यात हा क्षण आलाच नाही. 

लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्याची आणि देशवासियांना संबोधित करण्याची ही परंपरा १९४७ पासून म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून अखंड सुरु आहे. या काळात अनेक पंतप्रधान देशाने पाहिले, परंतू दोन असे पंतप्रधान होऊन गेले ज्यांना हा सन्मान मिळू शकला नाही. यात एक पंतप्रधान असे होऊन गेले जे दोनदा पंतप्रधान पदावर बसले होते. त्यांच्याही नशिबी हा योग आला नाही. 

२७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंचे निधन झाले. तेव्हा गुलझारीलाल नंदा यांना देशाचे कार्यवाहक पंतप्रधान बनविण्यात आले. परंतू, १३ दिवसांचाच काळ त्यांना मिळाल्याने त्यांच्या या काळात १५ ऑगस्टचा दिवस आला नाही.  ११ जानेवारी १९६६ ला पुन्हा नंदा देशाचे पंतप्रधान बनले. लाल बहादूर शास्त्रींचे निधन झाले होते. तेव्हाही त्यांचा कार्यकाळ १३ दिवसांचाच ठेवण्यात आला. अशाप्रकारे दोनवेळा पंतप्रधान होऊनही नंदा यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही. 

दुसरे पंतप्रधान कोण? 

1990-91 या काळात चंद्रशेखर हे भारताचे आठवे पंतप्रधान बनले. त्यांचा कार्यकाळ नंदा यांच्यापेक्षा खूप मोठा होता. जवळपास सहा महिने ते पंतप्रधान होते. देशात राजकीय अस्थिरता होती. त्यांना काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिलेला होता. परंतू, काही महिन्यांतच काँग्रेसने हा पाठिंबा काढून घेतला आणि चंद्रशेखर यांना राजीनामा द्यावा लागला. चंद्रशेखर यांचा हा कार्यकाळ होता १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१. या काळात १५ ऑगस्ट आलाच नाही. यामुळे चंद्रशेखर यांना देखील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला नाही.  

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन