शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

PM मोदी लाल किल्ल्यावरून असं काय बोलले? की समोर बसलेले CJI चंद्रचूड यांनी हात जोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 10:49 IST

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मातृभाषेतून शिक्षणाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, आम्ही मातृभाषेतून शिकविण्याला प्राधान्य दिले आहे...

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वतंत्र्य दिना निमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मातृभाषेतून शिक्षणाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, आम्ही मातृभाषेतून शिकविण्याला प्राधान्य दिले आहे. मुलांना मातृभाषेतून वाचता यायला हवे. आम्ही सर्वोच्च न्यायालयालाही धन्यवाद देतो. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आता ते जो निकाल देतील त्याचा ऑपरेटिव्ह भाग न्यायालयात आलेल्याला त्याच्याच भाषेत उपलब्ध होईल.

मातृभाषेला मोठे महत्वं - पंतप्रधान मोदी म्हणाले, आज मातृभाषेचे महत्व वाढत आहे. त्यांनी (नरेंद्र मोदी) सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक भाषेत जजमेन्टच्या ऑपरेटिव्ह संदर्भात भाष्य केले, तेव्हा सीजेआय चंद्रचूड तेथेच होते. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या या भाष्यावर हात उचलून अभिवादन केले. महत्वाचे म्हणजे, सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषांमध्ये शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे.

देशाच्या सीमा पूर्वीपेक्षाही अधिक सुरक्षित -मोदी म्हणाले, आपल्या देशाच्या सीमा पूर्वीपेक्षाही अधिक सुरक्षित झाल्या आहेत. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी आणि आपले सैन्य युद्धासाठी नेहमी सज्ज असावे, यासाठी आपल्या सैन्यात सातत्याने सुधारणा होत आहेत. आपण आधी रोज ऐकत होतो, येथे बॉम्ब स्फोट झाला, तेथे बॉम्ब स्फोट झाला. ठीक-ठीकाणी लिहिलेले असायचे, बॅगला स्पर्श करू नका. आज देश शांतता अनुभवत आहे. साखळी बॉम्ब स्फोट आता भूतकाळातल्या गप्पा झाल्या आहेत. निर्दोष नागरिकांचा होणारा मृत्यू, आता भूतकाळातील गोष्टी झाल्या आहेत. आज देशातील दहशतवादी हल्ल्यात मोठी घट झाली आहे. नक्षलग्रस्त भागांतही मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले आहे. परिवर्तनाचे वातावरण आहे.

हजार-बाराशे वर्षांपूर्वी या देशावर आक्रमण झाले अन्... - मोदी म्हणाले, "आपण जेव्हा इतिहासावर दृष्टी टाकतो, तेव्हा इतिहासात काही प्रसंग असे येतात, जे आपली कधीही न पुसली जाणारी छाप सोडून जातात आणि त्याचा परिणाम वर्षानू वर्षे राहतो. कधी कधी ती फार छोटीशी घटना वाटते. मात्र ती नंतर अनेक समस्यांचे मूळ बनते. हजार बाराशे वर्षांपूर्वी या देशावर आक्रमण झाले. एका छोट्याशा राजाचा पराभव झाला. मात्र, तेव्हा माहीतही नव्हते, की एक घटना भारताला हज वर्षाच्या गुलामीत अडकवेल आणि आपण गुलामीत अडक केलो. जे आले ते लुटत गेले, ज्याला वाटले, आले आणि आपल्यावर येऊन स्वार झाले. बंधूंनो घटना छोटी का असेना. पण तीने हजार वर्षे प्रभाव सोडला."

...आणि देशातील नारी शक्ती, युवा शक्ती, शेतकरी, देशासाठी उभे राहिले - "मी आज याचा उल्लेख यासठी करत आहे, की भारताच्या वीरांनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जबरदस्त संघर्ष केला. बलिदान दिले. मा भारती बेड्यांमधून मुक्त होण्यासाठी उभी राहिली होती आणि देशातील नारी शक्ती, देशातील युवा शक्ती, देशातील शेतकरी, मजदूर, असे अनेक लोक देशासाठी उभे राहिले. अनेक जण बलिदानासाठी तयार झाले होते. एक फौजच तयार झाली होती. हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते," असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्लाDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड