शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

खरंच अंकित शर्मा यांची हत्या करणाऱ्यांनी दिले 'जय श्रीराम'चे नारे?... जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 17:03 IST

याआधी देखील अंकूरने गर्दीच्या हातून माझ्या भावाला मारण्यासाठी ताहीर हुसेनने षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. या संदर्भात द वॉल स्ट्रीट जर्नलची संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. 

नवी दिल्ली - दिल्लीत झालेल्या धार्मिक हिंसेत मरण पावलेल्या इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीच्या अंकित शर्मा या कर्मचाऱ्याच्या हत्येसंदर्भात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अंकित यांच्यावर हल्ला 'जय श्रीराम'चे नारे लगावणाऱ्यांनी केला असा दावा अंकूर यांनी केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. मात्र यात तथ्य नसून हे वृत्त चुकीचे असल्याचे अंकूर यांनी म्हटले आहे.  

'द वॉल स्ट्रीट' जर्नलच्या रिपोर्टनुसार अंकितच्या भावाने सांगितले की, अंकित जेव्हा घरी परतत होता. त्यावेळी हिंसा करणाऱ्या एका समूहाने दगडफेक सुरू केली आणि त्याला एका गल्लीत नेले. हिंसा करणाऱ्यांकडे दगडं, काठ्या, चाकू आणि तलवारी होत्या. ते जोरजोरात जय श्रीराम, जय श्रीरामचे नारे लावत होते. यापैकी काहींनी हेल्मेट परिधान केलेले होते, असा दावाही त्या वृत्तात करण्यात आला होता. ‘India’s Ruling Party, Government Slammed Over Delhi Violenc या शिर्षकाखाली हे वृत्त होते. 

'द वॉल स्ट्रीट' जर्नलच्या रिपोर्टचा स्क्रिनशॉट, केवळ 'द वॉल स्ट्रीट' सबस्क्राईब करणाऱ्यांनाच हा रिपोर्ट वाचता येऊ शकतो.

दरम्यान अंकितचे भाऊ अंकूर यांच्याशी फॅक्टचेक अंतर्गत संवाद साधण्यात आला. त्यावेळी अंकूर यांनी द वॉल स्ट्रीट जर्नलचा रिपोर्ट फेटाळून लावला. द वॉल स्ट्रीट जर्नल खोटं सांगत आहे. मी सर्वांना हेच सांगत आलो की, माझ्या भावावर आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसेनच्या लोकांनी हल्ला केला होता. तसेच अंकितला ओढत हुसेनच्या घरी नेण्यात आले होते.

याआधी देखील अंकूरने गर्दीच्या हातून माझ्या भावाला मारण्यासाठी ताहीर हुसेनने षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टसंदर्भात द वॉल स्ट्रीट जर्नलशी संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.